शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हुतात्मा जवानांच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:51 IST

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेले हुतात्मे हे कालांतराने विस्मृतीत जातात.

प्रज्ञा म्हात्रेठाणे : हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांदरम्यान ‘एक गुढी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी...’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सीमेचे संरक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद वाटण्याचा निर्णय स्वागतयात्रांच्या पूर्वतयारीनिमित्त सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्वागतयात्रा संपल्यानंतर कार्यकर्ते हुतात्मा जवानांच्या घरी जाऊ न गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करणार आहेत. यावेळी त्यांना मिठाईचेही वाटप केले जाणार आहे.

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेले हुतात्मे हे कालांतराने विस्मृतीत जातात. या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसोबत गुढीपाडवा साजरा व्हावा, यासाठी ठाण्यातील हुतात्म्यांची नावे आयोजकांकडे द्यावी, असे आवाहन प्रा. विद्याधर वालावलकर यांनी केले. न्यासाचे पदाधिकारी स्वागतयात्रा संपल्यावर सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन येथे गुढी आणि मिठाई घेऊन उभे राहतील. चार ते पाच कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांच्या घरी जाऊन गुढीपाडवा त्यांच्यासोबत साजरा करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बैठकीच्या सुरुवातीला विश्वस्त डॉ. अश्विनी बापट यांनी स्वागतयात्रेचा धावता आढावा घेतला. बैठकीला पहिल्यांदाच आलेल्या काही संस्थांनी या स्वागतयात्रेतील आपल्या सहभागाविषयी सांगितले.हिंदू जागृती समितीतर्फे प्रथमोपचार प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. तसेच, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. इन्शुरन्सच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन कसे करावे यावर आधारित चित्ररथ असल्याचे कौस्तुभ कुलकर्णी यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि स्वागतयात्रेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वयंसेवक पुरविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला बाइक रॅलीसाठी आतापर्यंत ३०९ महिलांनी नोंदणी केली असल्याचे मीनल परब कारखानीस यांनी सांगितले. या बाईक रॅलीची ‘१०० टक्के मतदान’ अशी थीम ठेवण्यात आल्याने प्रत्येकाने या आशयाचा फलक आपल्या बाइकला लावावा, असे आवाहन यावेळी केले. या बैठकीला निमंत्रक कुमार जयवंत, अरविंद जोशी, संजीव ब्रह्मे उपस्थित होते.बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचनाच्चित्ररथांवरील संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चित्ररथ आदल्यादिवसापासून सेंट जॉन दि बाप्टीस स्कूलजवळ उभे करावे. या चित्ररथांच्या संरक्षणाची काळजी आयोजक घेतील, असे वालावलकर यांनी सांगितले.च्नृत्यामुळे स्वागतयात्रा खोळंबू नये यासाठी संबंधित संस्थांनी शिस्त पाळावी अशी सूचना यावेळी करण्यात आली.च् ज्यांच्या चित्ररथासोबत जास्त लोक असतील त्यांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.च्स्वागतयात्रेत ‘श्री राम जय राम जय जय राम’ असा रामनामाचा जप व्हावा अशी संकल्पना विश्व हिंदू परिषदेने मांडली. त्यालाही मान्यता देण्यात आली. पालखी येईपर्यंत सर्व चित्ररथांनी एकाच वेळी हा जयघोष करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेGudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८