शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

जीएसटी, महारेरा, नोटाबंदी ही तर बिल्डरांसाठी त्सुनामी - निरंजन हिरानंदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:52 AM

नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

ठाणे - नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.मागील काही वर्षांत संपूर्ण देशातील शहरांपैकी ठाण्यामध्ये सर्वाधिक गृहप्रकल्प उभे राहिले असून त्यामुळे ठाण्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गृहप्रकल्पांसोबतच आता व्यावसायिक क्षेत्राकडेही भर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन वर्षांत ३० हजार नोकºया तयार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.उपवन येथे होणाºया एका कार्यक्रमात १२ ते १५ जानेवारी या कालावधीत यंदा प्रथमच नरेडकोच्या माध्यमातून गृहप्रकल्पांचे, तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत शॉपिंग सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना विविध वस्तू खरेदी करता येऊ शकणार आहेत. तसेच त्याच ठिकाणी त्यांना सदनिका खरेदीचे पर्यायही उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती नरेडकोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी दिली.मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशा मुंबई महानगर क्षेत्रातील २०० गृहप्रकल्पांचा पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणेच परवडणाºया घरांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. कल्याण परिसरातील ३१ लाखांपासून तर ठाण्यात ४५ लाखांपासून पुढे किमती असलेली घरे असणार आहेत, असेही बांदेलकर यांनी सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्राची जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी दुबईच्या धर्तीवर प्रथमच शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी सांगितले. जीएसटी लागू झाल्यानंतर मंदीच्या तडाख्यात सापडलेला बांधकाम व्यवसाय नव्या वर्षात तेजीत येईल, असा दावा बांदेलकर यांनी केला. घरखरेदीवेळी ग्राहकांवर पडणारा जीएसटीचा भुर्दंड कमी करण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.मंदीच्या तडाख्यातून बिल्डर बाहेरअनोटाबंदी, जीएसटी लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागला. या तडाख्यातून व्यवसाय काहीसा सावरला असून येत्या वर्षात तो पुन्हा उभारी घेईल, असा दावा बांदेलकर यांनी केला. महारेरा कायद्यामुळे चुकीच्या गोष्टींना आळा बसणार असून त्याचा फायदा ग्राहकांनाच होईल. ग्राहकांना १२ टक्के वस्तू आणि सेवाकर भरावा लागत असून तो कमी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेGSTजीएसटीNote Banनोटाबंदी