शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

जीएसटीमुळे विकासकामांवर गंडांतर! शिवसेना गटनेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:19 IST

केडीएमसी क्षेत्रातील विकासकामांचे आधीच तीनतेरा वाजले असताना आता जीएसटीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परित्रकामुळेही येथील विकासकामांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे.

कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील विकासकामांचे आधीच तीनतेरा वाजले असताना आता जीएसटीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परित्रकामुळेही येथील विकासकामांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. २२ आॅगस्टपर्यंत ज्या विकासकामांचे कार्यादेश दिलेले नाहीत, त्या कामांच्या फेरनिविदा काढा, असे परिपत्रक सरकारने काढले आहेत. यामुळे विकासकामांना लागणारा बे्रक पाहता शिवसेना गटनेता रमेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सोपस्कार करून मंजूर झालेल्या विकासकामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे.केंद्र सरकारने १ जुलैपासून सीएसटी लागू केला. त्यावर राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना २२ आॅगस्टला परित्रक जारी केली आहेत. मात्र हे करत असताना सरकारने महापालिकांच्या अडचणी लक्षात घेतल्या नसल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले आहे.या निर्णयामुळे शहरी विकासकामांना फटका बसणार आहे, स्थायी समितीने दिलेल्या विकासकामांना सरकारनेच स्थगिती आदेश दिल्याने आठ महिने कामे रखडली होती. यातील बहुतांश कामे कार्यादेशापर्यंत तसेच कार्यादेश झालेली कामे पावसाळ््यामुळे व इतरही काही कारणामुळे होऊ शकलेली नाहीत. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, शौचालये बांधणे ही मुलभूत सुविधांची कामेही धिम्या गतीने सुरू असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.नोटबंदीनंतर नागरी प्रकल्पांच्या दृष्टीने जीएसटीचा निर्णयही जीवघेणा ठरला आहे. यामुळे हजारो सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारावर उपासमारीची तसेच आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी ठरणारा आहे. यामुळे जीएसटीची अंमलबजावणी करताना कार्यादेश झालेल्या व सर्व सोपस्कार पूर्ण झालेल्या विकासकामांना संमती द्यावी, अशी मागणी जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कंत्राटदारांकडून जीएसटी भरण्याबाबतचे लेखी संमतीपत्रक घेऊन विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी जाधव यांनी पत्रात केली आहे.