शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वाड्मयीन श्रीमंती वाढो- मधु मंगेश कर्णिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:41 IST

अंबरनाथमध्ये पुस्तक नगरी उपक्रमाचे शानदार उद्घाटन

अंबरनाथ : शहरात सुरू करण्यात आलेला पुस्तक नगरी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अंबरनाथची वाङ्मयीन श्रीमंती अशीच वृद्धिंगत होवो, वाचकांची अभिरूची सातत्याने वाढत राहो, असे आशीर्वाद पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी दिले.अंबर भरारी, ग्रंथाभिसरण मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने अंबरनाथमध्ये या उपक्र माचे प्रजासत्ताक दिनी लोकार्पण झाले. मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानात हा सोहळा झाला. इतिहास, कला, कथा, कादंबरी, पत्रकारिता अशा विविध विषयांची पुस्तके वाचकांना उपलब्ध होणार आहेत.साहित्य नगरी नावाची चळवळ वर्षभरापासून अंबर भरारी या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली होती. यात ग्रंथाभिसरण संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सहकार्य करण्यात आले. या उपक्र मासाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत या उपक्रमासाठी सर्वसामान्य वाचक, सरकारी अधिकारी, साहित्यिक संस्था, सामाजिक संघटना, पत्रकार यांनी पुस्तके दान केली.ज्या प्रमाणे तारे आकाशात असल्याने आकाशाचे सौंदर्य अधिक खुलते, तसे या जगात कवी, साहित्य, पुस्तके असल्याने आनंद मिळतो. या जगातून कवी, साहित्य, साहित्यिक, पुस्तके नष्ट झाली तर जगात काय उरेल असा सवाल कर्णिक यांनी यावेळी केला. आपल्या मनाला, आत्म्याला आनंद देण्याचे काम पुस्तक, साहित्यातून होत असते. अंबरनाथ हे साहित्यावर अपार प्रेम करणारे शहर आहे म्हणूनच लोकसहभागातून ‘साहित्य नगरी’उभारणारे पहिले शहर म्हणून मान मिळाला आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वि. स. खांडेकरांचे जावई कर्नल श्रीराम पेंढारकर यांची या सोहळ्यात भेट होणे हा दुग्धशर्करा योग जुळून आल्याचेही त्यांनी सांगितले.भिलार येथे सरकारला कोट्यवधी खर्च करून जे यश मिळाले नाही ते अंबरनाथ मध्ये लोकसहभागातून पुस्तक नगरी साकारून मिळाले, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ही नगरी मुंबई, ठाणे, पुणे या शहरांपेक्षा साहित्य संस्कृती क्षेत्रात सर्वात पुढे जाईल आणि म्हणूनच या शहराचा खासदार असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. या शहरात चित्रपट महोत्सव, शिवमंदिर महोत्सव, साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन असे उपक्र म यशस्वी होत आहेत. म्हणूनच या शहरात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या नावाने साहित्य उद्यान साकारले आहे. डॉ. महेश केळुस्कर, प्रदीप ढवळ, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आदी मान्यवरांची भाषणे झाली.भविष्यात १०० केंद्रे उभारण्याचा निर्धारया माध्यमातून सध्याच्याघडीला २० हजार पुस्तके जमा झाल्याची माहिती अंबर भरारीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली. या पुस्तकांच्या मदतीने शहरातील ३५ ठिकाणी पुस्तकांचे केंद्र उभारण्यात आले आहे.येत्या काळात १०० केंद्र उभारून त्यात विविध विषयांना वाहिलेल्या पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्य