शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

उल्हासनगरातील मैदाने झाले नशेखोरांचा अड्डा; दारूच्या बाटल्यांचा खच, मैदानाची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 16:38 IST

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात वृद्ध, मुले, नागरिक आदींसाठी व्हिटीसी, दसरा व गोल मैदान अशी तीन मैदाने आहेत.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील व्हिटीसी मैदानाची काही क्रिडा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्हिटीसी मैदानाची साफसफाई केली असता, मैदानात दारूच्या बॉटलचा खच मिळाला. तीच परिस्थिती गोलमैदान व दसरा मैदानाची झाली असून महापालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात वृद्ध, मुले, नागरिक आदींसाठी व्हिटीसी, दसरा व गोल मैदान अशी तीन मैदाने आहेत. मात्र तिन्ही मैदानाची दुरावस्था झाली. मैदानात मुलांना खेळता यावे म्हणून, कॅम्प नं-४ परिसरातील व्हिटीसी मैदानाच्या साफसफाई साठी भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांनी पुढाकार घेतला. स्थानिक क्रिकेटक्लब, कबड्डी संघ, गोलंदान शॉपर, सामना प्रतिष्ठान आदीं पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून मैदानाची साफसफाई दोन दिवासापूर्वी करण्यात आली. साफसफाई वेळी कचऱ्यासह मैदानाच्या बसण्याची जागा व शौचालय परिसरात दारूच्या बॉटलचा खच आढळल्याने, क्रीडा प्रेमींना धक्का बसला. शेजारील महापालिका क्रीडा संकुल इमारती मध्ये प्रभाग समिती कार्यालय असून त्यामधील बॅडमिंटन कोर्ट या इनडोअर क्रीडा संकुलची दुरावस्था झाल्याचा आरोप बोबडे यांनी केला.

 व्हिटीसी मैदाने प्रमाणे कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानाची दुरावस्था झाली असून मैदानात सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने सायंकाळच्या ७ नंतर सर्वसामान्य नागरिक मैदानात जाऊ शकत नाही. मैदानाची ताबा भुरटे चोर, नशेखोर, गर्दुल्ले, भिकाऱ्यांनी घेतल्याचे चित्र असते. महापालिका व पोलीस काहीएक कारवाई करीत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच शहरातील प्रसिद्ध गोलमैदाना मध्ये नॉनवेज व दारू पार्टी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या महिन्यात मैदानात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांने, मैदानात फिरण्यात आलेल्या महिलांना प्रवेशद्वार बंद करून कोंडून घेतल्याचा प्रकार उघड झाला होता. तर शेजारील उद्यानात सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचा गैरफायदा घेऊन महिलांचे खून यापूर्वी झाले. नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी तिन्ही मैदानाचे नुतनीकरण व दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. 

उद्यानावर भूमाफियांची नजर, नुतनीकरनाची मागणी

 महापालिकेने नेताजी, नाना-नाणी पार्क, सपना गार्डन, लाल लोई अश्या मोजक्याच उद्यानाचे नुतनीकरण केले. इतर उद्याने नुतनीकरनाच्या प्रतीक्षेत असून कितपत पडलेल्या उद्यानाचा गैरवापर होत आहे. भूमाफियांचा डोळा असलेल्या उद्यानाची नागरिकांसाठी दुरुस्ती व नुतनीकरण करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे