शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

हे ‘मैदान’ नव्हे धमकावण्याचे!

By admin | Updated: March 31, 2016 02:52 IST

दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रांगोळीच्या मैदानावरून प्रसिद्ध रांगोळीकार वेद कट्टी यांना अनोळखी व्यक्तींनी मंगळवारी धमकावले. ‘जे काही चालले आहे, ते थांबवा

ठाणे : दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रांगोळीच्या मैदानावरून प्रसिद्ध रांगोळीकार वेद कट्टी यांना अनोळखी व्यक्तींनी मंगळवारी धमकावले. ‘जे काही चालले आहे, ते थांबवा, नाहीतर रांगोळी काढता येणार नाही’ अशा शब्दांत दम दिला. त्याचा कलाक्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे. सांस्कृतिकनगरीत ही दादागिरी खपवून घेता कामा नये, असा सूर मान्यवरांनी लावला. गेल्या अनेक वर्षांपासून गावदेवी मैदानात रांगोळी रेखाटणाऱ्या रंगवल्ली संस्थेला या वर्षी मैदान दिले गेले नाही. ‘प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार हे मैदान रंगवल्लीला मिळाले नाही. १५-१६ वर्षांपासून आपण रांगोळी रेखाटत असून आपल्याला जाणीवपूर्वक डावलले गेल्याचा आरोप वेद कट्टी यांनी केला. त्यामुळे हा मैदानाचा वाद पेटला. त्या प्रकरणी त्यांनी आवाज उठविल्यामुळे त्यांना धमकी देण्यापर्यंत प्रकरण गेले. ते समजताच त्यावर कला क्षेत्रातील मान्यवरांनी निषेध करत ‘मैदाना’वरून धमकावणे आपली संस्कृती नसल्याचे मत व्यक्त केले. ठाण्यासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरात अशी असहिष्णुता बरी नव्हे, असा तिरकस सल्लाही त्यांनी दिला.एखाद्या कलाकाराला धमकी देणे अयोग्यच आहे. परंतु, ज्या संस्थेने गावदेवी मैदानात रांगोळी काढण्यासाठी अर्ज केला, त्यांना ते मैदान मिळाले. रंगवल्लीने गृहीत धरले होते की, त्यांना मैदान नक्की मिळणार. परंतु, नियमाप्रमाणे आधी बुकिंग करणाऱ्यांना मैदान मिळणे योग्य आहे. यात काही गैर नाही. थोडक्यात, त्यांनी मैदान आधी घेण्याचा प्रयत्न केला.- सदाशिव कुलकर्णी, चित्रकारअशा प्रकारचा त्रास कलाकाराला देऊ नये. कलेवर प्रेम नसलेल्यांनी हे कृत्य केले आहे. हा माणुसकीवरचा हल्ला आहे. तुम्हाला काही येत नसेल तर कमीतकमी कलेचा आस्वाद तरी घ्यावा. अशा घटनेचा सौम्य शब्दांत निषेध करतो. - गुणवंत मांजरेकर, रंगावलीकारही गंभीर बाब आहे. शेवटी, रांगोळी ही एक कला आहे आणि संस्कृती म्हणून कलेची मांडणी होते. घडलेली घटना ही संस्कृतीवर केलेला प्रहार आहे. ज्या मंडळींनी हे कृत्य केले, त्यांनी शांतपणे विचार करायला हवा होता. रांगोळी ही वैयक्तिक कला नसून ती पूर्वापार चालत आलेली आहे. ती संस्कृती आहे. - विजयराज बोधनकर, चित्रकारएखादा कलाकार एखाद्या जागेत अनेक वर्षे रांगोळी काढत असेल तर त्यांच्याआधी दुसऱ्या संस्थेने ते मैदान जाऊन बुक करणे, हे अयोग्य आहे. त्यात कलाकाराला धमकी दिली जाते, हे योग्य नाहीच. कलाकाराला त्याची कला सादर करण्याची मुक्तता हवी. - त्र्यंबक जोशी, रंगावलीकार