शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विकासकामांना हिरवा कंदील

By admin | Updated: March 28, 2017 05:56 IST

सरकारच्या परिपत्रकामुळे रखडलेली १०७ कोटींची विकासकामे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मार्गी लागण्याची

उल्हासनगर : सरकारच्या परिपत्रकामुळे रखडलेली १०७ कोटींची विकासकामे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे. अर्थात, आयुक्तांनी हे विषय स्थायी समितीत सादर केले पाहिजे. यावर स्थायी समिती निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.महापालिका निवडणुका झाल्यानंतर स्थायी समिती व महासभेत धोरणात्मक निर्णय व आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय घेऊ नये, असे परिपत्रक सरकारने २८ फेब्रुवारीला काढले होते. या परिपत्रकाविरोधात स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपत असून तोपर्यंत अधिकार घेण्याचा निर्णय जुन्याच नगरसेवक व पदाधिकारी यांचा असल्याचे म्हटले आहे. सरकारचे परिपत्रक म्हणजे आमच्या अधिकारावर गदा येत असल्याचे मत सुर्वे यांनी व्यक्त केले.उच्च न्यायालयात सुर्वे यांची बाजू ऐकली. सुर्वे समितीची बैठक बोलवून निर्णय घेऊ शकतात. मात्र, विषय देण्याचे काम पालिका आयुक्तांचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आयुक्तांनी रखडलेल्या विकासकामाचे विषय दिले नाहीतर, न्यायालयासह सरकार व हरित लवादाचा हक्कभंग झाला, असे समजून न्यायालयाचे दरवाजे पुन्हा ठोठावू, असे सुर्वे म्हणाले. तर, आयुक्त सुधाकर शिंदे यांनी उच्च न्यायालयाचा आदेश वाचल्यानंतर नियमानुसार निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली. (प्रतिनिधी)स्थायीच्या बैठकीला नगरसेवक येणार का?महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ५ एप्रिलला होणार असून ३० मार्चला अर्ज भरायचे आहेत. महापौरपदासाठी भाजपा व शिवसेना आमनेसामने उभे ठाकले असून नगरसेवकांची पळवापळवी व फोडाफोडीची चर्चा शहरात रंगली आहे. दरम्यान, महापौर अपेक्षा पाटील यांनी जुन्या नगरसेवकांची सोमवारी पुन्हा महासभा बोलवली आहे. तर, सुर्वे यांनी बोलवलेल्या बैठकीत जुने नगरसेवक येणार का, असा प्रश्न उभा ठाकला आहे.