शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

चणे खावे लोखंडाचे, हेच ब्रीद!

By admin | Updated: March 28, 2017 05:40 IST

एकेकाळी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत असलेले गोविंद मेघवाल धंद्यात फसवणूक झाल्याने

अजित मांडके / ठाणेएकेकाळी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत असलेले गोविंद मेघवाल धंद्यात फसवणूक झाल्याने अक्षरश: रस्त्यावर आले. मात्र, त्याच्या अंगात जिद्द आणि चिकाटी असल्याने त्यांनी पुन्हा यशाची उंच गुढी उभारण्याचा निर्धार केला आहे. नौपाडा भागात सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत टेम्पोमधून शेंगदाणे, चणे विकणाऱ्या ५६ वर्षीय मेघवाल यांची कहाणी ही प्रेरणादायी आहे.एकेकाळी मेघवाल यांचे लोखंड बनवणाऱ्या कंपनीत २५ टक्के शेअर्स होते. त्यांच्या अशिक्षिततेचा गैरफायदा घेऊन काही मंडळींनी त्यांना फसवले. फसवणूक करणाऱ्यांविरोधात न्यायालयीन लढा सुरूच ठेवला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि पुन्हा व्यवसाय करून मोठे ध्येय गाठण्यासाठी त्याने चणे, शेंगदाण्याची फॅक्टरी टाकली आहे. घणसोलीत मेघवाल वास्तव्यास असून पत्नी, दोन मुले, त्यांच्याही पत्नी आणि मुलगी असा मोठा परिवार आहे. गोविंद यांनी आपल्या दोन मित्रांच्या साथीने १९९० मध्ये श्रीकृष्ण प्लास्टिक कंपनी सुरू केली होती. तिघेही अशिक्षित होते. अल्पावधीतच त्यांच्या कंपनीने यश संपादित केले. परंतु, अशिक्षित असल्याने कंपनीचा गाडा हाकायचा कसा, असा पेच त्यांच्यापुढे होता. त्यामुळे दोघांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेऊन दुसरा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्याला मेघवाल यांनी हरकत घेतली. त्यानंतर, दोघांनी कंपनी विकून गोविंद यांचा २५ टक्के शेअर लोखंड तयार करणाऱ्या नव्या कंपनीच्या मालकाच्या हाती दिला. त्यानंतर, काही वर्षे गोविंद त्या कंपनीत होते. एक दिवस त्यांना कामावरून कमी करून चक्क घरी जाण्यास सांगितले. मी या कंपनीचा मालक असल्याचे मेघवाल यांनी सांगितले. परंतु, तुम्ही साधे कर्मचारी नसल्याचे उत्तर त्यांना देऊन हाकलून लावण्यात आले. आपल्याच कंपनीतून अशा पद्धतीने काढून टाकण्यात आल्याने मेघवाल हताश झाले. आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह या संकटात ते सापडले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तक्रार घेण्यास सुरुवातीला नकार दिला. अखेर, त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर कुठे तक्रार दाखल झाली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.कुटुंब चालवण्यासाठी काहीतरी रोजगार हवाच, म्हणून त्यांनी घणसोलीतच छोटा गाळा घेण्याकरिता सुमारे ७ लाखांचे कर्ज काढले. तेथे गरमागरम चणेशेंगदाणे भाजण्याचे काम केले जाते. या कामात त्यांची दोनही मुले, त्यांच्या पत्नी आणि गोविंद यांची पत्नी तसेच मुलगी मोलाचा हातभार लावतात. पुन्हा शून्यातून यशाची गुढी उभारण्यास गोविंद यांनी सुरुवात केली आहे. पहाटे ४ वाजता उठून चणे-शेंगदाणे भाजले जातात. त्यानंतर, त्यांचा मुलगा सकाळी टेम्पो घेऊन ठाण्यात नौपाडा भागात सोडतो. आइस फॅक्टरी भागात ते याच टेम्पोत बसून चणे व शेंगदाणे विकण्याचा व्यवसाय करतात. मुलगा शहरभर फिरून दुकानांतून, पानटपऱ्यांवर चणे, शेंगदाण्याच्या आॅर्डर घेतो. रात्री ९ वाजेपर्यंत चणे-शेंगदाणे विकून हे पितापुत्र घरी जातात. मी हार मानलेली नाही. व्यवसायात पुन्हा यश मिळवण्याची जिद्द असल्याचे मेघवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यांची मुलगी एमबीएचे शिक्षण घेत असून मुलगा आयएएसचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. याच व्यवसायातून मुलांना पायावर उभे करायचे असून न्यायालयीन लढा देऊन फसवणूक करणाऱ्यांना अद्दल घडवायची आहे, असे मेघवाल ठामपणे सांगतात.