शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पुरस्कार मिळणार नसल्यामुळे ग्रामसेवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:09 IST

सर्व निकष पूर्ण करूनही पुरस्कारासाठी निवड झाली नसल्याचे कळताच कल्याण पंचायत समितीच्या नियंत्रणातील वाकळण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रघुनाथ हरड यांनी संतापात विषप्राशन करून आत्महत्या केली.

ठाणे : निलंबित झालेल्या, पात्र नसलेल्या ग्रामसेवकाची उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाली. पण, सर्व निकष पूर्ण करूनही पुरस्कारासाठी निवड झाली नसल्याचे कळताच कल्याण पंचायत समितीच्या नियंत्रणातील वाकळण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रघुनाथ हरड यांनी संतापात विषप्राशन करून आत्महत्या केली.या घटनेमुळे ३ नोव्हेंबर रोजी होणारा हा पुरस्कार वितरण समारंभ रद्द केल्याच्या वृत्तास ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.वाय. जाधव यांनी दुजोरा दिला. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामसेवकांना येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाद्वारे उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सर्व निकष पूर्ण करत असतानाही हरड यांची निवड झाली नाही. यासाठी त्यांनी कार्यालयात वादही घातला होता. या मनस्तापातून त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा हरड यांच्या गावासह जिल्ह्यातील ग्रामसेवकांमध्ये ऐकायला मिळत आहे.यासंदर्भात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय शेळके यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीदेखील या वृत्तास दुजोरा दिला. या आत्महत्येमागे त्यांच्या परिवारातील वादही कारणीभूत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ऐन दिवाळीत अकस्मात मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषदेने पुरस्कार सोहळा रद्द केला असून अन्य योजनेच्या आढाव्यासह मार्गदर्शनासाठी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील ग्रामसेवकांची बैठक घेतली जाणार आहे. या आत्महत्येविषयीचे मूळ कारण जिल्हा परिषद प्रशासनाने शोधून दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.आजचा पुरस्कार सोहळा रद्दउत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामसेवकांना येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाद्वारे उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यासाठी सर्व निकष पूर्ण करत असतानाही हरड यांची निवड झाली नाही. त्यामुळे त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. मुरबाड तालुक्यातील सरळगावजवळील डांगुर्ले येथील हरड मूळचे रहिवासी आहेत. हरड यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला पुरस्कार वितरण समारंभही जिल्हा परिषदेने रद्द केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याthaneठाणे