शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Gram Panchayat Election Result: ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा

By अनिकेत घमंडी | Updated: December 20, 2022 17:38 IST

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद ...

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद जिंकले आहे. मुरबाडमध्ये १४ पैकी ८, कल्याणमधील ९ पैकी ५ ग्रामपंचायतीतही भाजपाने यश संपादन केले. तर भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठीत कोनगाव व कारिवली ग्रामपंचायतीतही भाजपचा झेंडा फडकला आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व कायम राहिल्याचा दावा मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

 जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी झाल्या होत्या. या ग्रामपंचायतींची मतमोजणी आज सकाळी नऊपासून सुरू झाली. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून भाजपाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. भिवंडी तालुक्यातील १३ पैकी १० ठिकाणी भाजपाचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. तर दोन ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना, तर एका ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजय मिळाला. शहापूरमध्ये पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत भाजपाने एकहाती वर्चस्व मिळविले. तर मुरबाडमधील १४ पैकी ८ व कल्याणमधील ९ पैकी पाच ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठीत व श्रीमंत कोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या  रेखा सदाशिव पाटील, कारिवलीत संजय परशुराम नाईक, आमणे येथे विश्वपाल रामदास केणे, सापे येथे भाजपाचे गोरखनाथ बारकू सुतार, कोपरमध्ये हेमंत घरत, आवळे विश्वगड येथे प्रिती पवन देसले, खालिंग बु. येथे राजाराम पाटील, दुगाडमध्ये प्रेमा प्रकाश मुकणे, कांबे येथे आरती विजय जाधव, अकलोली येथे संचिता म्हसकर यांनी भाजपाचा झेंडा फडकविला.

भाजपाच्या उमेदवारांनी दणदणीत यश मिळविल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.  कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील यांनी निवडणुकीची रणनीती आखल्याचे ते म्हणाले.

शहापूरातही दोन ग्रामपंचायती -शहापूर तालुक्यात झालेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर भाजपाने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुकाध्यक्ष भास्कर जाधव व सुभाष हरड यांच्या प्रयत्नाने चिखलगाव व बाभळे येथे भाजपला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मुरबाड, कल्याणमध्ये आघाडीमुरबाडमधील १४ पैकी ८ ग्रामपंचायतीत भाजपाला यश मिळाले. तळेगाव, साकुर्ली, डोंगरन्हावे, मोहघर, कान्होळ, तोंडली, वैशाखरे, मोहघर येथे भाजपाचा झेंडा फडकला. तर कल्याणमधील ९ पैकी पाच ठिकाणी भाजपाने सरपंचपद जिंकल्याचे ते म्हणाले.

तीन महिन्यांपूर्वीही भिवंडीत भाजपाच अव्वलसुमारे तीन महिन्यांपूर्वी भिवंडी तालुक्यात झालेल्या निवडणुकीतही ३१ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने सर्वाधिक १२ ग्रामपंचायती जिंकल्या होत्या. तर उद्धव ठाकरे गटाला ८, बाळासाहेबांची शिवसेना, श्रमजीवी आणि मनसेला प्रत्येकी एक, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट व अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर यश मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचthaneठाणेbhiwandiभिवंडी