शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

गोविंदवाडी बायपास आठवडाभरात खुला

By admin | Updated: December 27, 2016 02:52 IST

शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तयार केलेल्या कल्याण पत्रीपूल ते दुर्गाडी या एक किलोमीटरच्या गोविंदवाडी बायपास रस्त्याची एक बाजू आठवडाभरात

कल्याण : शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तयार केलेल्या कल्याण पत्रीपूल ते दुर्गाडी या एक किलोमीटरच्या गोविंदवाडी बायपास रस्त्याची एक बाजू आठवडाभरात तर दुसरी बाजू महिनाभरात खुली केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. कल्याणमध्ये उभारण्यात येत असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, गोविंदवाडी बायपास रस्त्याची शिंदे यांनी सोमवारी पाहणी केली. त्याचबरोबर डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाजवळ केडीएमसीच्या १८ घंटागाड्यांचेही लोकार्पण केले. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी, माजी नगरसेवक सचिन बासरे आदी मान्यवर उपस्थित होते. एमएसआरडीसीने २०११ पासून एमएमआरडीएच्या निधीतून गोविंदवाडी बायपास तयार केला. त्याचे दुर्गाडीकडील एक टोक तबेल्याच्या पुनर्वसनामुळे रखडले होते. हा वाद न्यायप्रविष्ट होता. तबेलेवाल्याचे पुनर्वसन पालिकेने केल्याने रस्त्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शरफुद्दीन कर्ते व स्थानिक नगरसेवक काशीब तानकी यांनी सहकार्य केले. तेव्हा रस्ता सुरु करण्यात कोणतीही अडसर येणार नाही, अशी ग्वाही २०१५ च्या महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे यांनी दिली होती. सोमवारी या रस्त्याची पाहणी करून एक बाजू आठवडाभरात, तर दुसरी महिनाभरात खुली करण्याची घोषणा केली. त्यामुळे कल्याणमधील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) बाळासाहेबांचे स्मारक १० जानेवारीपर्यंत पूर्णकल्याण पश्चिमेला काळा तलाव येथे १० कोटी खर्चून उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. ठाकरे यांचा पुतळा कोल्हापुरात तयार करण्यात आला आहे. स्मारकाच्या ठिकाणी भव्य कमान, तसेच आर्ट गॅलरी उभारली आहे. तेथे बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडण्यात येईल. या स्मारकाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे महापालिकेच्या हद्दीतही स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या दोन्ही महापालिकांच्या आधी नव्हे, तर देशातील पहिले स्मारक पूर्ण करण्याचा मान कल्याण-डोंबिवली महापालिकेला मिळणार आहे. बाळासाहेबांचे बालपण काळा तलाव परिसरात गेले असल्याने महापालिकेने काळा तलावाचे सुशोभिकरण केले. या तलावाच्या विकासाचे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्नही शिवसेनेने पूर्ण केले.