शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

शासनाने मराठी शाळांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:24 IST

ठाणे : मराठी शाळा चालवणे, ही शासनाची प्रथम जबाबदारी आहे. मराठी शाळांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, असे मत आनंद ...

ठाणे : मराठी शाळा चालवणे, ही शासनाची प्रथम जबाबदारी आहे. मराठी शाळांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, असे मत आनंद निकेतन, नाशिक या मराठी प्रयोगशील शाळेच्या संस्थापक - संचालिका विनोदिनी काळगी यांनी व्यक्त केले.

शनिवारी मराठी अभ्यास केंद्र संलग्न मराठी शाळा संस्थाचालक संघाने ''मराठी शाळांचे आर्थिक प्रश्न व आव्हाने'' या वेबसंवादाचे आयोजन मराठी शाळांच्या संस्थाचालकांचासाठी केले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४० मराठी शाळांचे संस्थाचालक या वेबसंवादाला उपस्थित होते. वेबसंवादाचे प्रास्ताविक मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी केले. मराठी शाळा संचालक संघाचे संचालक सदस्य सुरेंद्र दिघे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यानंतर शिक्षक, संस्थाचालक व शिक्षण अभ्यासक

विलास परब यांनी ''मराठी शाळांसाठी शासनाचे आर्थिक धोरण काय असायला हवे? या विषयावर मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी शिक्षणावरची तरतूद कमी होत जाणे, ही बाब धक्कादायक असल्याचे सांगितले. विनाअनुदानित शाळांना मान्यता देताना मराठी शाळांच्या अस्तित्त्वाला धक्का लागणार नाही, अशा प्रकारचे धोरण असायला हवे? व यासाठी एक समिती असायला हवी, असेही त्यांनी सुचवले. याचा सरळ सरळ संबंध या मराठी शाळांच्या अर्थकारणाशी असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या परिस्थितीत पगार नसलेल्या शिक्षकांना सरकारने मदत करायलाच हवी, सोबत अनुदानित व विनाअनुदानित असे वर्गीकरण मुलांमध्ये शासनाने करू नये. सर्व प्रकारच्या सोयी सर्व मुलांना सारख्याच प्रमाणात द्यायला हव्यात. शासनाने आज प्राधान्याने शिक्षकांच्या पगाराचा व विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांचा प्रश्न हाताळायला हवा. वेतनेतर अनुदानाबाबतची अनिश्चितता मराठी शाळांसाठी धोक्याची घंटा असून, जसे आज अनुदान देता म्हणजे तुम्ही त्यांना स्वीकारता तेव्हा त्यांची जबाबदारीही शासनाने समर्थपणे उचलायला पाहिजे. सरकारने पोर्टल तयार करून संस्थाचालकांच्या गरजा मागून त्यावर युद्धपातळीवर काम करावे, तरच मराठी शाळांचा निभाव लागू शकेल, अशी सूचनाही त्यांनी मांडली. रिक्त पदांच्या प्रश्नासाठी शासनाने युद्धपातळीवर विचार करावा, असेही ते म्हणाले.