शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडकरांच्या दबावतंत्राने सरकारी पेच

By admin | Updated: April 5, 2016 01:13 IST

विक्रमगडकरांना तालुक्याच्या दर्जानंतर नगरपंचायतीचा दर्जा हवा असताना गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नगरविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या

तलवाडा : विक्रमगडकरांना तालुक्याच्या दर्जानंतर नगरपंचायतीचा दर्जा हवा असताना गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नगरविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या. मात्र, याविरोधात सर्वपक्षीय उमेदवारांसह अपक्षांनी बहिष्काराचे अस्त्र उगारून ही निवडणूक न लढवण्याचा आपला निर्णय यशस्वी केला. २९ मार्च ते २ एप्रिल या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी एकही अर्ज न दाखल झाल्याने गावकऱ्यांचा निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी ठरला आहे. त्यामुळे नगरपंचायत स्थापण्यासाठी राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे आणि निवडणुकांबाबतचा पेचही कायम आहे.विक्रमगड ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्ताव नगरविकासमंत्र्याकडे प्रस्तावित असताना नगरपंचायतीची निवडणूक घेण्याऐवजी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. याबाबत, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करूनसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात येत असल्याविरोधात नगरपंचायतीसाठी सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यांनी गेल्या महिनाभरापासून या विषयास विरोध करीत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. अखेरच्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याने नगरपंचायतीसाठी केलेल्या ऐक्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यातील प्रतिष्ठेची असलेली ग्रामपंचायत निवडणूक होणार नसल्याने एकजुटीची इतर ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य यांनी प्रशंसा केली आहे.शासनाच्या घोषणेप्रमाणे शहर व लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यामध्ये विक्रमगड ग्रामपंचायतीचे २०११ च्या जनगणनेनुसार १० हजार लोकसंख्येप्रमाणे १७ वॉर्ड आहेत़ या अनुषंगाने ही नगरपंचायत घोषित होणे अपेक्षित असताना ग्रामपंचायतीची निवडणूक १७ एप्रिल रोजी घेतली जात असल्याने हा पेच उभा राहिला आहे. यासंदर्भात रविवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन या ग्रामंपचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट केले. तसेच, या विषयाबाबत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे़ राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावरच्या आणि १० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने दोन वर्षांपूर्वीच आघाडी सरकारने घेतला होता़ त्या दृष्टीने सरकारी यंत्रणेने सर्वेक्षणही केले होते़ त्यानंतर, तसा प्रस्तावही मागवण्यात आले होते़ त्यानंतर, पालघर जिल्ह्यातील लोकसंख्येने जास्त असलेल्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला गेल्या वर्षीच तसा प्रस्ताव पाठवला होता़ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तालुका ग्रामपंचायती नगरपंचायती होऊन निवडणुका झाल्या़ शहापूर व मुरबाडचे उदाहरण सर्वांसमोर आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आले आहेत़ मात्र, तरीही आता होणाऱ्या निवडणुकीत या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा न देता ग्रामपंचायत म्हणून निवडणुका घेतल्या जात आहेत़ त्यामुळे सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आक्षेप घेतला होता़ ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देऊन निवडणुका घेतल्या आहेत़ त्यामुळे पालघरमध्ये हा निर्णय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न सर्वपक्षीयांनी केला आहे़ च्विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड ग्रामपंचायत वगळता ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १७ एप्रिलला होणार आहेत़ तालुक्यातील १४३ प्रभागांतून ३९२ उमेदवारांची निवडणूक घ्यावयाची असून त्यामध्ये अनु. जमातीसाठी (महिला) १९५ जागा व इतर सर्वांसाठी १९७ जागांचा समावेश आहे़ च्फॉर्म भरण्याच्या पहिल्या दिवसापासूनच उमेदवारांची गर्दी होती, तर शेवटच्या दोन दिवसांत गर्दीचा ओघ वाढून २९ मार्च व १ एप्रिलदरम्यान ११७६ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले असून त्याची छाननी सोमवार, ३ एप्रिलला होणार आहे़ च्तहसील कार्यालयाची जागा अपुरी असल्याने फॉर्म देण्यासाठी व स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयासह कृषी कार्यालय, पंचायत समिती व आयटीआय येथे १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती़ च्२०१६ मध्ये माकपाची डोल्हारी बु. ग्रामपंचायतीची परंपरा मोडीत डोल्हारी बु़ ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून बिनविरोधात माकपाची सत्ता आहे़