शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

विक्रमगडकरांच्या दबावतंत्राने सरकारी पेच

By admin | Updated: April 5, 2016 01:13 IST

विक्रमगडकरांना तालुक्याच्या दर्जानंतर नगरपंचायतीचा दर्जा हवा असताना गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नगरविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या

तलवाडा : विक्रमगडकरांना तालुक्याच्या दर्जानंतर नगरपंचायतीचा दर्जा हवा असताना गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नगरविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या. मात्र, याविरोधात सर्वपक्षीय उमेदवारांसह अपक्षांनी बहिष्काराचे अस्त्र उगारून ही निवडणूक न लढवण्याचा आपला निर्णय यशस्वी केला. २९ मार्च ते २ एप्रिल या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी एकही अर्ज न दाखल झाल्याने गावकऱ्यांचा निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी ठरला आहे. त्यामुळे नगरपंचायत स्थापण्यासाठी राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे आणि निवडणुकांबाबतचा पेचही कायम आहे.विक्रमगड ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्ताव नगरविकासमंत्र्याकडे प्रस्तावित असताना नगरपंचायतीची निवडणूक घेण्याऐवजी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. याबाबत, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करूनसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात येत असल्याविरोधात नगरपंचायतीसाठी सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यांनी गेल्या महिनाभरापासून या विषयास विरोध करीत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. अखेरच्या दिवशी एकही अर्ज दाखल न झाल्याने नगरपंचायतीसाठी केलेल्या ऐक्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. जिल्ह्यातील प्रतिष्ठेची असलेली ग्रामपंचायत निवडणूक होणार नसल्याने एकजुटीची इतर ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य यांनी प्रशंसा केली आहे.शासनाच्या घोषणेप्रमाणे शहर व लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यामध्ये विक्रमगड ग्रामपंचायतीचे २०११ च्या जनगणनेनुसार १० हजार लोकसंख्येप्रमाणे १७ वॉर्ड आहेत़ या अनुषंगाने ही नगरपंचायत घोषित होणे अपेक्षित असताना ग्रामपंचायतीची निवडणूक १७ एप्रिल रोजी घेतली जात असल्याने हा पेच उभा राहिला आहे. यासंदर्भात रविवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन या ग्रामंपचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट केले. तसेच, या विषयाबाबत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे़ राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावरच्या आणि १० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने दोन वर्षांपूर्वीच आघाडी सरकारने घेतला होता़ त्या दृष्टीने सरकारी यंत्रणेने सर्वेक्षणही केले होते़ त्यानंतर, तसा प्रस्तावही मागवण्यात आले होते़ त्यानंतर, पालघर जिल्ह्यातील लोकसंख्येने जास्त असलेल्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला गेल्या वर्षीच तसा प्रस्ताव पाठवला होता़ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तालुका ग्रामपंचायती नगरपंचायती होऊन निवडणुका झाल्या़ शहापूर व मुरबाडचे उदाहरण सर्वांसमोर आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आले आहेत़ मात्र, तरीही आता होणाऱ्या निवडणुकीत या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा न देता ग्रामपंचायत म्हणून निवडणुका घेतल्या जात आहेत़ त्यामुळे सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आक्षेप घेतला होता़ ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देऊन निवडणुका घेतल्या आहेत़ त्यामुळे पालघरमध्ये हा निर्णय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न सर्वपक्षीयांनी केला आहे़ च्विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड ग्रामपंचायत वगळता ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १७ एप्रिलला होणार आहेत़ तालुक्यातील १४३ प्रभागांतून ३९२ उमेदवारांची निवडणूक घ्यावयाची असून त्यामध्ये अनु. जमातीसाठी (महिला) १९५ जागा व इतर सर्वांसाठी १९७ जागांचा समावेश आहे़ च्फॉर्म भरण्याच्या पहिल्या दिवसापासूनच उमेदवारांची गर्दी होती, तर शेवटच्या दोन दिवसांत गर्दीचा ओघ वाढून २९ मार्च व १ एप्रिलदरम्यान ११७६ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले असून त्याची छाननी सोमवार, ३ एप्रिलला होणार आहे़ च्तहसील कार्यालयाची जागा अपुरी असल्याने फॉर्म देण्यासाठी व स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयासह कृषी कार्यालय, पंचायत समिती व आयटीआय येथे १२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती़ च्२०१६ मध्ये माकपाची डोल्हारी बु. ग्रामपंचायतीची परंपरा मोडीत डोल्हारी बु़ ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून बिनविरोधात माकपाची सत्ता आहे़