शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

By नितीन पंडित | Updated: March 21, 2024 17:24 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

भिवंडी: भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून,अचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा निहाय ९ असे एकूण ५४ भरारी पथके २४ तास कार्यरत राहणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी गुरुवारी प्रांत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे व जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ४ मे रोजी उमेदवारी अर्ज छाननी,६ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २० मे रोजी मतदान तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील सावद येथील प्रशस्त गोदामात स्ट्रॉंग रूम बनविण्यात येणार असून ईव्हीएम मशीन याच ठिकाणी ठेवण्यात येणार असून मतमोजणी देखील याच ठिकाणी होणार आहे. 

भिवंडी लोकसभा मतदारसंघात या वर्षी एकूण २० लाख ३९ हजार ४४९ मतदारांची नोंद करण्यात आली असून येत्या ३ मे पर्यंत मतदार नाव नोंदणीची मुभा असल्याने ही मतदार संख्या अजूनही वाढणार आहे.या मतदारांमध्ये ८५ वर्षांवरील १७ हजार ९५ मतदार असून व दिव्यांग मतदार ९०८९ असून या निवडणुकीत प्रथमच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या नागरिकांना टपालाद्वारे मातदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे.या निवडणुकीसाठी २१८९ मतदान केंद्र असणार असून यामध्ये मुरबाड विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ५११ मतदान केंद्र असल्याची माहिती जाधव यांनी यावेळी दिली आहे.

निवडणुकी संदर्भातील तक्रारी करण्यासाठी, उमेदवारांच्या मालमत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवण्यासाठी,मतदाराला आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे तपासण्यासाठी तसेच इतर माहिती देण्यासाठी विविध ऑनलाइन ऍप बनविण्यात आले असून प्रथमच उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ऑनलाइन ॲप विकसित करण्यात आलेले आहे.आचारसंहिता भंग केल्या संदर्भातील तक्रारी ऍपवर प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण पुढील १०० मिनिटांमध्ये करण्यात येणार आहे. तर या निवडणुकीत उमेदवारास निवडणूक खर्च मर्यादा ही ९५ लाख रुपये करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी यावेळी दिली आहे.

निवडणूक कालावधीमध्ये विविध तक्रारी संदर्भात मुख्य निवडणूक कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून त्या साठी टोल फ्री क्रमांक १८०० २३३ १११४  हा सुरू करण्यात आला असून तो २४ तास सुरू राहणार असून या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढीसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम हे या कालावधीत सुरू राहणार असून समाजाने सुद्धा मतदान प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी