शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर रंगकर्मींना सरकारने दाखवली मुंबईची वाट, घाणेकर नाट्यगृहाच्या दुरूस्तीच्या घोळापायी हक्काचा प्रेक्षक गमवल्याचे शल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:34 IST

ठाणे : नाट्यगृह उपलब्ध न झाल्याने ठाणे शहरात दरवर्षी होणारी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ठाणेकर प्रेक्षकांनी गमावली आहे.

प्रज्ञा म्हात्रेठाणे : नाट्यगृह उपलब्ध न झाल्याने ठाणे शहरात दरवर्षी होणारी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ठाणेकर प्रेक्षकांनी गमावली आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या नाट्य संस्थांना नाटक सादर करण्यासाठी मुंबईतील साहित्य संघात जावे लागणार असल्याने रंगकर्र्मींनी नाराजी व्यक्त केली.५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सहभागी होणा-या ठाण्यातील नाट्यसंस्थांना महाराष्ट्र शासनाने मुंबईत नाटक सादर करण्यास भाग पाडल्याने ठाण्यातील नाट्यकर्मींनी आक्रोश व्यक्त केला. ठाणे शहरात अनेक वर्षांपासून या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येत होती. मात्र यावर्षी घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू असल्याने ठाणे शहरात सादर होणारी रायगड आणि नवी मुंबंईतील नाट्यसंस्थांसाठी पनवेल हे नवे केंद्र यावर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यात आले आहे. ठाणे शहरातील नाट्य संस्थांना मात्र मुंबईची वाट दाखवण्यात आली आहे.घाणेकर नाट्यगृहाला गडकरी रंगायतन किंवा ठाणेनजीकच्या मुलुंडमधील कालीदास नाट्यगृहाचा पर्याय होता. मात्र तिथे ही स्पर्धा न घेता ठाणे शहराशी असलेल्या हौशी नाट्याचे नातेच शासनाने तोडून टाकल्याच्या भावना रंगकर्र्मींनी व्यक्त केल्या. या निमित्ताने आम्ही ठाण्यातील हक्काचा प्रेक्षक गमावला असल्याची खंत ‘लोकमत’शी बोलताना अनेकांची व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५७ वी हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ नोव्हेंबरपासून होणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरचे काम सुरू असल्याने या ठिकाणी असणाºया ‘ठाणे केंद्रा’ची ओळखच संपवण्यात आली आहे. कल्याण केंद्रावर सादर होणारी नाटके यावर्षी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सादर होणार आहेत.ठाणेकर नाट्यसंस्थांना मुंबईत प्रयोग करण्यासाठीचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. याशिवाय मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. हे व्यावसायिक कलाकार नाही, हौशी कलाकार आहे. त्यामुळे त्यांना इथून मुंबईला जाऊन नाटक सादर करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागणार आहे, असे मत गेली अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणा-या एका नाट्यकर्मीने मांडले.ठाणे केंद्रासाठी नाट्यगृह ठाण्यात उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या नाट्यसंस्थांना मुंबईत घुसविणे चुकीचे आहे. वर्षानुवर्षे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या स्पर्धा होतात, हे माहित असताना पालिकेला तसे आधीच सांगणे गरजेचे होते. त्यातून दुरुस्तीचे काम जलद झाले असते.असा मुद्दा मांडतानाच मुंबईला पाठविल्यामुळे खर्च वाढलाच, पण राज्य नाट्य स्पर्धेत उतरणा-या स्थानिक नाट्य संस्थांचा प्रेक्षक असतो, प्रोत्साहन देणारे रसिक आम्ही गमावला, याला फक्त शासनाचा अनागोंदी कारभार जबाबदार आहे, अशा भावना नाट्यसंस्था आणि रंगकर्मींनी व्यक्त केल्या.