शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणा-यांवर दंडात्मक कारवाईचे मीरा-भाईंदर पालिकेला शासनाकडून अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 13:37 IST

सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौच व लघुशंका करण्यासह थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार आहे. शासनाने मीरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील सर्व पालिकांना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार प्रदान केले आहेत.

धीरज परब / मीरारोड - सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौच व लघुशंका करण्यासह थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार आहे. शासनाने मीरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील सर्व पालिकांना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार प्रदान केले आहेत. शासनाला लेखी अभिवेदन देण्याची आवश्यकता नसल्याची भुमिका घेत मीरा भार्इंदर पालिकेने तत्काळ दंड वसुली साठी स्वच्छता निरीक्षक व मुकादमांना जबाबदारी दिली आहे. तर कर्मचारयांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय.मीरा भार्इंदर महापालिकेने शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता व घाण करणारयां विरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविधी मंजुर करुन शासना कडे पाठवले होते. परंतु शासनाने त्यास मंजुरीच दिली नसल्याने गेल्या काही वर्षा पासुन शहरात अस्वच्छता करणारे मोकाटच होते. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मध्ये कचरयाचे वर्गिकरण करण्याची तसेच रोज १०० किलो वा त्या पेक्षा अधिक कचरा निर्माणकर्त्याने त्यांच्या कचरया वर प्रक्रिया करण्याची जबाबदारी निश्चीत केली आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाने देखील परिपत्रके काढली आहेत.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राज्य शासनाने देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान मोहिमेची सुरवात केली असुन शहर स्वच्छ व हगणदारी मुक्त करण्यास प्राधान्य दिले आहे. परंतु घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करणारया व स्वच्छतेसाठी सहकार्य न नागरीकां कडुन दंड वसुल करण्यासाठी शासनाने ३० डिसेंबर रोजी आदेश काढुन सर्व महापालिकांना दंडात्मक कारवाईचे अधिकार प्रदान केले आहेत.मीरा भार्इंदर ड वर्गातील महापालिका असल्याने शहरात उघड्या जागेवर शौचास बसणारया कडुन ५०० रु. ; सार्वजनिक ठिकाणी वा उघड्यावर लघुशंका करणे, थुंकणे यासाठी १०० रु. तर सार्वजनिक ठिकाणी - रस्त्यावर घाण करणारयास १५० रु. दंड आकारले जाणार आहेत. महापालिका अधिनियमातील तरतुदी नुसार शासनाने सदर दंड आकारण्याचे निर्देश का देऊ नयेत ? म्हणुन १५ दिवसात लेखी अभिवेदन देखील मागवले आहे. तर सदर आदेशाची अमलबजावणी तत्काळ करण्याचे देकील त्या खाली नमुद केले आहे.शासनास लेखी अभिवेदन करण्याची गरज नसुन पालिकेने दंड वसुलीची अमलबजावणी तत्काळ सुरु करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व मुकादम यांना दंड वसुली करण्याची दिल्याचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगीतले आहे.दरम्यान पालिकेत फक्त १३ स्वच्छता निरीक्षक तर ७० मुकादम आहेत. ७० पैकी बहुतांशी मुकादम यांना लिखापढी कारकूनी येतच नाही. शिवाय आधिच दैनंदिन कचरा - गटार सफाई व कचरा उचलणे , तक्रारींचे निराकरण करणे, सर्वसाधारण दंड वसुली, प्लॅस्टीक पिशव्या कारवाई, माती भराव कारवाई, आपत्कालीन व्यवस्थापन, स्वच्छता अभियान, हॉटेल आदी विक्रते कडुन घनकचरा शुल्क वसुल करण्याची कामं आहेत.त्यातच अस्वच्छता करणार-याकडून दंड वसुलीचे काम सोपवल्यास कामाचा ताण वाढणार आहे. शिवाय अस्वच्छता करणार-यांकडून दंड वसुलीची कारवाई करते वेळी वादावादी, मारहाण वा उलटस्वरुपी तक्रारींचे प्रकार होण्याची भीती आहे. त्यामुळे अस्वच्छता पसवरणार-यांकडून दंड वसुलीसाठी पालिकेने अन्य महापालिकांप्रमाणेच मार्शल नेमावेत, अशी भूमिका स्वच्छता निरीक्षकांनी त्यांच्या बैठकीत घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान