शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

जिल्ह्यांतील रस्त्यांचे १२ कोटी खर्चाअभावी होणार शासनजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 01:01 IST

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; लोकप्रतिनिधींत संताप, सर्वसाधारण सभेत प्रशासनास धरले धारेवर

- सुरेश लोखंडे ठाणे : खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ११ कोटी ९७ लाखांचा निधी गेल्या वर्षी मंजूर झाला. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या निधीतून अद्याप ही कामे झाली नाहीत. मार्च महिना जवळ आल्यामुळे खर्चाअभावी तो परत जाण्याच्या भीतीने लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागास चांगलेच धारेवर धरले आहे.गावखेडे व शहरांना जोडणाºया रस्त्यांची आधीच दयनीय अवस्था आहे. यामुळे ग्रामीण जनता विविध समस्यांना तोंड देत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेची दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) गेल्या वर्षी जिल्हा मार्गांसाठी १२ कोटी ५७ लाख व ग्रामीण रस्त्यांसाठी १७ कोटी मंजूर केले. मात्र, ग्रामीण रस्त्यांचा अजूनही सहा कोटींचा निधी खर्च झालेला नाही. यावर डीपीसीत खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी बांधकाम विभागाला जाब विचारून तीव्र संताप व्यक्त केला.या सहा कोटींप्रमाणेच जिल्हा मार्गांचेदेखील १२ कोटी ५७ लाखपैैकी पाच कोटींचे काम झाले नाही. मार्चअखेरपर्यंत या कामांच्या निविदा काढून कामे पूर्ण होणार नाहीत. मार्च अखेरपर्यंत हा निधी रस्त्यांवर खर्च होणार नाही. रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यावर हा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. पण, मार्चअखेरपर्यंत रस्त्यांची कामे होणार नसल्यामुळे हा मंजूर निधी शासनजमा होणार आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त करून जिल्हा परिषद अधिकाºयांना धारेवर धरले आहे.कामांच्या फायली लोकप्रतिनिधींच्या घरातग्रामीण रस्त्यांचे सहा कोटी आणि जिल्हा मार्गांचा शिल्लक पाच कोटी सात लाखांचा निधी शासनजमा होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या घरी या कामांच्या फायली लपवून ठेवल्याचा आरोप केला जात आहे. रकमा मोठ्या असल्यामुळे या कामांच्या निविदा वेळेवर काढणे शक्य झाले नसल्याचे सांगितले जात आहे. पण, आता अत्यंत कमी काळ शिल्लक असल्यामुळे निविदा काढून रस्त्यांची कामे होणार नाहीत. यामुळे ग्रामीण व आदिवासी-दुर्गम भागांच्या रस्त्यांची अवस्था सुधारण्याचा मार्ग यंदाही धूसर झाला आहे.दोषींवर कारवाई करा - पालकमंत्रीनिधी वेळेवर खर्च न करणाºया अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सूतोवाच नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. त्यांच्या या कारवाईत किती अधिकारी गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.