शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

उल्हासनगरातील शासकीय बालगृह अंधारात, मनसेच्या इशाऱ्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत

By सदानंद नाईक | Updated: February 7, 2023 18:04 IST

उल्हासनगरातील कॅम्प नं-५ परिसरात शासनाच्या महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागाचे शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे अपंग बालगृह व शासकीय मुलींचे निरीक्षणगृह आहे. 

उल्हासनगर : शहरातील शासकीय मुलांचे वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलाचे अपंग बालगृह व मुलींचे निरक्षणगृहाचे वीज बिल थकल्याने, महावितरणने वीज पुरवठा खंडित केला. गेले एक आठवडा अंधारात असलेल्या बालगृहाचा वीज पुरवठा मनसेच्या आंदोलनामुळे पूर्ववत केला. उल्हासनगरातील कॅम्प नं-५ परिसरात शासनाच्या महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागाचे शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे अपंग बालगृह व शासकीय मुलींचे निरीक्षणगृह आहे. 

यामध्ये आई-वडील नसलेले, इतरत्र सापडलेल्या मुलांना ठेवले जाते. बालगृहाचा मोफत सुखसुविधा मुलांना मिळत असून जिल्ह्यात सर्वाधिक ४ बालगृह, मुलीचे निरीक्षणगृह व महिलांचे निरीक्षणगृह आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेकडो मुलांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत. बालगृह व मुलींचे निरीक्षणगृह यांचे वीज बिलाची थकबाकी वाढल्याने, गेल्या सहा महिन्यांपूर्वी महावितरण विभागाने त्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने, मुलांना व मुलींना गेले १५ दिवस अंधारात राहावे लागले होते. पुन्हा हाच प्रकार घडला असून एकून ३ बालगृहे व मुलीचे निरक्षणगृहाचा वीज पुरवठा खंडित केल्याने, गेले ८ दिवस मुले व मुली अंधारात राहिल्याचे उघड झाले. 

मनसे विद्यार्थी सेनेचे मनोज शेलार यांच्यासह अन्य जणांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यावर बालगृह व मुलीचे निरीक्षण गृहाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्षरीत्या भेटून बालगृहाची समस्या असून निधी देण्याची मागणी केली. शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृहाचे अधिक्षक विनोद वळवी यांनी शहरातील तीन बालगृह व मुलींचे निरीक्षणगृह यांची विजबिल थकबाकी वाढली होती. शासनाचा निधी आल्यानंतर वीज बिलाचा भरणा करतो, अशी विनंती महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना करूनही वीज पुरवठा खंडित केल्याचे सांगितले. यामुळे बालगृहतील मुले व निरीक्षण गृहातील मुली अंधारात राहिल्याची माहिती दिली. याप्रकारने शहरातून शासन कारभारावर टीका होत आहे.

टॅग्स :kalyanकल्याण