शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:10 IST

पाण्यासाठी बारवीमध्ये आरक्षण मिळाले. योजना सुरू करण्यासाठी अमृत योजनेतून निधीही मिळाला. मात्र, असे असले तरी पाण्याची कोंडी मात्र अजूनही कायम आहे.

अंबरनाथ आणि बदलापूरमधील पाणीसमस्या सोडवण्यासाठी बारवी धरणातून ५० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्थात, हे पाणी घेण्यासाठी दोन्ही पालिका क्षेत्रात जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी लागणारा निधीही सरकारने मंजूर केला आहे. पाण्यासाठी बारवीमध्ये आरक्षण मिळाले. योजना सुरू करण्यासाठी अमृत योजनेतून निधीही मिळाला. मात्र, असे असले तरी पाण्याची कोंडी मात्र अजूनही कायम आहे. वाढीव पाणी मिळत असले, तरी जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मात्र ठोसपणे होत नाही. त्यामुळे प्राधिकरणाने आधी ही पाणीकोंडी सोडवणे गरजेचे आहे.बारवी धरणात उंची वाढल्याने ४८८ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाण्यातून काही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. त्यात अंबरनाथसाठी २४ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे, तर बदलापूरकरिता २६ दशलक्ष लीटर पाणी मंजूर करण्यात आले आहे. आजघडीला बदलापूर शहरासाठी जीवन प्राधिकरणामार्फत ४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.बदलापूरची वाढती लोकसंख्या पाहता हा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे बदलापूरला अतिरिक्त पाण्याची गरज भासत होती. बारवी धरणाची उंची वाढवण्याच्या कामानिमित्ताने बदलापूरला अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, बारवी धरणातून नेमके किती पाणी मिळणार, याबाबत कुणालाच शाश्वती नव्हती. बदलापूरला सरकारने २६ एमएलडी पाणी मंजूर केल्याने पुढील २० वर्षांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. मात्र, इतके पाणी उपलब्ध होणार असले, तरी त्याचे नियोजन करण्यासाठी जीवन प्राधिकरण कमी पडत आहे. वाढीव पाणी मिळणार असले, तरी अजूनही वितरणाचे नियोजन झालेले नाही.अंबरनाथच्या लोकसंख्येचा विचार करता ७० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे, तर बदलापूरला ५२ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. सोबत, अंबरनाथच्या आयुध निर्माणी कारखान्याला नऊ दशलक्ष लीटर पाणी देणे बंधनकारक आहे. या तिन्हींचा विचार करता आजघडीला अंबरनाथ आणि बदलापूरसाठी १३१ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. जीवन प्राधिकरण त्या अनुषंगाने बॅरेज धरणातून ९० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे, तर एमआयडीसीकडून १००, भोज धरणातून सहा आणि चिखलोली धरणातून सहा असे एकूण ११२ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होते. मात्र, गरजेपेक्षा २० दशलक्ष लीटर पाणी कमी पडत असल्याने प्राधिकरणाने ३० दशलक्ष लीटर पाण्याची तत्काळ मागणी केली होती. या मागणीच्या प्रमाणात सरकारने दोन्ही शहरांसाठी एकूण ५० दशलक्ष लीटर पाणी मंजूर केले आहे. मात्र, असे असले तरी वितरणव्यवस्थेत सुधारणा अजूनही झालेली नाही. त्यामुळे बदलापूरमध्ये उल्हास नदीवर उपसाविहीर बांधण्यासाठी १०८ दशलक्ष लीटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, ३४ किलोमीटरच्या वितरणवाहिन्या टाकणे, सात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम प्रस्तावित करत त्यासाठी ६३ कोटींची योजना तयार केली होती. त्या योजनेलाही मंजुरी दिली असून आता बदलापूरमधील वाढीव पाण्यासोबत वितरणव्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.या योजनेत बदलापूर पूर्व भागात मानकवली, एमआयडीसी शिरगाव, मॅरेथॉननगरी, कीर्ती पोलीसलाइन या भागात, तर पश्चिम भागात बौद्धवाडा, ठाकूरवाडी, सोनवली, वालिवली, वडवली असे नऊ नवीन जलकुंभ प्रस्तावित आहेत.प्राधिकरणाने सक्षम होणे गरजेचेयाआधीही नगरोत्थान योजनेतून आणि अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात निधीची तरतूद केली होती. तरीही, वितरणव्यवस्थेत तीळमात्र सुधारणा झालेली नाही. अनेक वर्षे पाणी नाही, अशी बोंब मारून पाणीटंचाईचे कारण पुढे केले जात होते. मात्र, आज परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. तरीही, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्राधिकरणाने सक्षम होणे गरजेचे आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकbadlapurबदलापूर