शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गोर बोलीभाषेला हवा संविधानात्मक दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:37 IST

बंजारा समाज हा कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यांमध्ये विखुरलेला आहे

डोंबिवली : बंजारा समाज हा कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यांमध्ये विखुरलेला आहे. परंतु तरीही या समाजाची भाषा आणि पेहराव एक आहे. या समाजातील साहित्य आणि संस्कृती ही मौखिक साहित्याच्या आधारांवर टिकून आहे. देशात सात कोटी बंजारा समाजबांधव आहेत. त्यामुळे या भाषेला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यिक व संमेलनाध्यक्ष मोहन नाईक यांनी व्यक्त केली.आॅल इंडिया भारतीय बंजारा सेवा संघाने येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात पाचवे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन भरवले आहे. त्याचे उद्घाटन गुरुवारी आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी नाईक बोलत होते.नाईक पुढे म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या संविधानात गोरबंजारा बोलीभाषेसाठी घटनात्मक दुरुस्ती झाली पाहिजे. या समाजाच्या इतिहास लोप पावत आहे. या समाजाचे अस्तित्व टिकावे, यासाठी साहित्य प्रगल्भ झाले पाहिजे. बंजारा समाजाची संस्कृती ही जागतिक दर्जाची संस्कृती आहे. ही संस्कृ ती लोप पावू नये. शब्दांची वारंवार उत्क्रांती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.वास्तववाद, स्वच्छंदतावाद, अभिजातवाद यांची तंड्यातून निर्मिती झाली आहे. बौद्धिक चळवळ म्हणून ही गणली जाते. या संस्कृतीत मानवतावाद, बंधुत्व दिसून येतो. संस्कृतीत समानता दिसून येते. स्वतंत्र भारतात बंजारा समाज उपेक्षित आहे. राज्यघटनेनुसार त्यांना हक्क मिळालेला नाही. बिटिश काळात या समाजाचा मुख्य व्यवसाय रसद पुरवणे हा होता. मात्र, पुढे हा व्यवसाय ठप्प झाला. हा समाज कष्टकारी असून, तो केवळ जंगलात आणि तांड्यात राहतो. या समाजाचे साहित्य हे मौखिक परंपरेतून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे. पण या समाजातील महिलाही लेखणीचा वापर करतील. हा समाज शोषणमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी गणेश मंदिरापासून सावित्रीबाई फुले कलामंदिरापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. त्यात समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

समाजाच्या उत्थानासाठी एकत्र : देशातील विविध भागांतून गोरबंजारा समाजबांधव या संमेलनासाठी आले आहेत. समाजाची संस्कृती, परंपरा यांचे संवर्धन करणे हा या साहित्य संमेलनामागील उद्देश आहे. गोरबंजारा बोलीभाषा टिकली पाहिजे. समाजातील मुलांना शिक्षण आणि आरक्षणाचा लाभ सरकारकडून मिळायला हवा. समाजाच्या उत्थानासाठी काय केले पाहिजे आदी विषयांवर या दोन दिवसीय संमेलनात चर्चा होणार आहे.