शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

गोर बोलीभाषेला हवा संविधानात्मक दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:37 IST

बंजारा समाज हा कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यांमध्ये विखुरलेला आहे

डोंबिवली : बंजारा समाज हा कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यांमध्ये विखुरलेला आहे. परंतु तरीही या समाजाची भाषा आणि पेहराव एक आहे. या समाजातील साहित्य आणि संस्कृती ही मौखिक साहित्याच्या आधारांवर टिकून आहे. देशात सात कोटी बंजारा समाजबांधव आहेत. त्यामुळे या भाषेला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यिक व संमेलनाध्यक्ष मोहन नाईक यांनी व्यक्त केली.आॅल इंडिया भारतीय बंजारा सेवा संघाने येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात पाचवे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन भरवले आहे. त्याचे उद्घाटन गुरुवारी आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी नाईक बोलत होते.नाईक पुढे म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या संविधानात गोरबंजारा बोलीभाषेसाठी घटनात्मक दुरुस्ती झाली पाहिजे. या समाजाच्या इतिहास लोप पावत आहे. या समाजाचे अस्तित्व टिकावे, यासाठी साहित्य प्रगल्भ झाले पाहिजे. बंजारा समाजाची संस्कृती ही जागतिक दर्जाची संस्कृती आहे. ही संस्कृ ती लोप पावू नये. शब्दांची वारंवार उत्क्रांती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.वास्तववाद, स्वच्छंदतावाद, अभिजातवाद यांची तंड्यातून निर्मिती झाली आहे. बौद्धिक चळवळ म्हणून ही गणली जाते. या संस्कृतीत मानवतावाद, बंधुत्व दिसून येतो. संस्कृतीत समानता दिसून येते. स्वतंत्र भारतात बंजारा समाज उपेक्षित आहे. राज्यघटनेनुसार त्यांना हक्क मिळालेला नाही. बिटिश काळात या समाजाचा मुख्य व्यवसाय रसद पुरवणे हा होता. मात्र, पुढे हा व्यवसाय ठप्प झाला. हा समाज कष्टकारी असून, तो केवळ जंगलात आणि तांड्यात राहतो. या समाजाचे साहित्य हे मौखिक परंपरेतून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे. पण या समाजातील महिलाही लेखणीचा वापर करतील. हा समाज शोषणमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी गणेश मंदिरापासून सावित्रीबाई फुले कलामंदिरापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. त्यात समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

समाजाच्या उत्थानासाठी एकत्र : देशातील विविध भागांतून गोरबंजारा समाजबांधव या संमेलनासाठी आले आहेत. समाजाची संस्कृती, परंपरा यांचे संवर्धन करणे हा या साहित्य संमेलनामागील उद्देश आहे. गोरबंजारा बोलीभाषा टिकली पाहिजे. समाजातील मुलांना शिक्षण आणि आरक्षणाचा लाभ सरकारकडून मिळायला हवा. समाजाच्या उत्थानासाठी काय केले पाहिजे आदी विषयांवर या दोन दिवसीय संमेलनात चर्चा होणार आहे.