शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पालिका समाज मंदिरातील सामान पालिकेनेच पळवून बांधकाम तोडायला मोकळीक दिली; काँग्रेसचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 18:45 IST

२०१४ साली सिद्धकला भजनी मंडळ ह्या महिलांच्या संस्थेस समाज मंदिर ५ वर्षांच्या कराराने भाड्याने पालिकेने दिले .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शांती नगर मैदानात पालिकेने बांधलेले समाज मंदिर हे कलावती आईंची उपासना करणाऱ्या सिद्धकला भजन मंडळास दिले असताना पालिकेनेच त्यातील सामान परस्पर काढून नेत भूखंड खाजगी व्यक्तीला मोकळा करून देण्यासाठी समाज मंदिरच जमीनदोस्त केल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल सावंत , गटनेता जुबेर इनामदार , जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेविका मर्लिन डिसा , गीता परदेशी, नगरसेवक अशरफ शेख आदींनी पत्रकार परिषदेत महापालिका आणि सत्ताधारी भाजपावर या प्रकरणी आरोप केले आहेत. मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ९, सर्वे क्रमांक २०६ मधील मैदान हे विकासक शांतीस्टार बिल्डरच्या बांधकाम मंजुरीत आरजी भूखंड दाखवला आहे . विकासकाने सदर जागेचा फायदा घेतला आहे . सदर आरजी विकासकाने पालिकेस देखभालीसाठी दिले होते . पालिकेने मैदान विकसित करण्यासह सदर ठिकाणी समाज मंदिर बांधले. तसेच अन्य कामे केली. 

२०१४ साली सिद्धकला भजनी मंडळ ह्या महिलांच्या संस्थेस समाज मंदिर ५ वर्षांच्या कराराने भाड्याने पालिकेने दिले . दरम्यान सदर जागेची मालकी हि पेणकरपाड्यातील पाटील कुटुंबीयांची सिद्ध झाल्याने त्यांनी सदर जागे भोवती आपले कुंपण टाकून जागा ताब्यात घेतली . पाटील कुटुंबीयांनी अनेकवर्ष संघर्ष करून स्वतःचा हक्क मिळवला , तर जमीन मालकीचा वाद निर्माण झाला असताना महापालिकेने विकासकाला आरजी जागेचा दिलेला फायदा सुद्धा रद्द केला नाही.  ३१ मे रोजी मंडळाची मुदत संपलेली असल्याने त्यांनी मुदतवाढ मागितली . परंतु पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी टाळे असताना समाज मंदिरातील मंडळाचे सामान काढून गाडीत भरून घेऊन गेले . त्या नंतर सदर समाज मंदिराचे बांधकाम पाडून टाकण्यात आले . 

ह्या प्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित , कनिष्ठ अभियंता सचिन पाटील , नगररचना अधिकारी आदींवर कारवाई करा. विकासकाला मोबदला दिलेला असताना तसेच पालिकेचा कब्जा असताना खाजगी लोकांना कब्जा कसा घेऊ दिला ? समाज मंदिरच्या बांधकाम साठी पालिकेने करदात्या जनतेचे पैसे खर्च केले असताना त्याचे नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसच्या सावंत , सामंत आदींनी केला आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक