शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

#GoodBye2017: एक दिवसाच्या जल्लोषाचा विशेष परवाना बेकायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:56 IST

ठाणे- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली.

डोंबिवली- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लहान-मोठी सुमारे ९०० हॉटेल आहेत. ३१ डिसेंबरसह विविध सण-उत्सवांसाठी गर्दी होते. पण यातील ब-याचशा पार्ट्यांची कल्पनाच आम्हाला नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवणार कसे, असा प्रश्न अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी उपस्थित केला. एक्साईज विभागही अशा विशेष तरतुदीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांच्या अधिकाºयांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निरोपासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया पार्ट्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास तिला सामोरे कसे जायचे, हा मोठा पेच आहे. कल्याण-डोंबिवलीत मोकळ््या जागेत, हॉलमध्ये होणाºया समारंभांत जर आपत्कालीन परिस्थिती ओढवली, तर अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. अग्नीशमन दलाच्या अधिकाºयांशी चर्चा केल्यावर त्यांनीही नेमक्या किती ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या होणार आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. त्यासंदर्भात ३० डिसेंबरला संध्याकाळी माहिती मिळेल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. तशी माहिती मिळाली तरी संध्याकाळनंतर नेमक्या किती ठिकाणी पोचता येईल, याबद्दल ते साशंक आहेत.>अंबरनाथ-बदलापुरात निम्मीच सुरक्षाअंबरनाथ, बदलापूर परिसरात निम्म्याच हॉटेलांनी सुरक्षेचे नियम कसेबसे पाळल्याची माहिती असून उरलेल्या ठिकाणी या नियमांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.नववर्षानिमित्त सर्व हॉटेल आणि धाबे फुल्ल होणार आहेत, याची कल्पना असतानाही अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहरात ३० ते ३५ हॉटेलांनाच परवानगी देण्यात आली आहे. उरलेली सर्व हॉटेल बेकायदा सुरू राहतील.मुंबईतील आगीनंतर अग्निशमन विभाग जागा झाला आहे. त्यांनी आता शहरातील हॉटेल, धाबे यांच्या सुरक्षेची चाचणी सुरू केली आहे. बदलापूर आणि परिसरात अग्नीशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यांच्या जीवावर अवघ्या ३५ हॉटेलमध्ये सुरक्षेचे उपाय योजल्याची शक्यता आहे. निम्म्या हॉटेलांनीच सुरक्षेकडे लक्ष पुरवले आहे. उरलेल्यांनी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना आखलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे.