शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

#GoodBye2017: एक दिवसाच्या जल्लोषाचा विशेष परवाना बेकायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:56 IST

ठाणे- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली.

डोंबिवली- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लहान-मोठी सुमारे ९०० हॉटेल आहेत. ३१ डिसेंबरसह विविध सण-उत्सवांसाठी गर्दी होते. पण यातील ब-याचशा पार्ट्यांची कल्पनाच आम्हाला नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवणार कसे, असा प्रश्न अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी उपस्थित केला. एक्साईज विभागही अशा विशेष तरतुदीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांच्या अधिकाºयांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निरोपासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया पार्ट्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास तिला सामोरे कसे जायचे, हा मोठा पेच आहे. कल्याण-डोंबिवलीत मोकळ््या जागेत, हॉलमध्ये होणाºया समारंभांत जर आपत्कालीन परिस्थिती ओढवली, तर अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. अग्नीशमन दलाच्या अधिकाºयांशी चर्चा केल्यावर त्यांनीही नेमक्या किती ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या होणार आहेत, याची माहिती नसल्याचे सांगितले. त्यासंदर्भात ३० डिसेंबरला संध्याकाळी माहिती मिळेल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. तशी माहिती मिळाली तरी संध्याकाळनंतर नेमक्या किती ठिकाणी पोचता येईल, याबद्दल ते साशंक आहेत.>अंबरनाथ-बदलापुरात निम्मीच सुरक्षाअंबरनाथ, बदलापूर परिसरात निम्म्याच हॉटेलांनी सुरक्षेचे नियम कसेबसे पाळल्याची माहिती असून उरलेल्या ठिकाणी या नियमांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.नववर्षानिमित्त सर्व हॉटेल आणि धाबे फुल्ल होणार आहेत, याची कल्पना असतानाही अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. शहरात ३० ते ३५ हॉटेलांनाच परवानगी देण्यात आली आहे. उरलेली सर्व हॉटेल बेकायदा सुरू राहतील.मुंबईतील आगीनंतर अग्निशमन विभाग जागा झाला आहे. त्यांनी आता शहरातील हॉटेल, धाबे यांच्या सुरक्षेची चाचणी सुरू केली आहे. बदलापूर आणि परिसरात अग्नीशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यांच्या जीवावर अवघ्या ३५ हॉटेलमध्ये सुरक्षेचे उपाय योजल्याची शक्यता आहे. निम्म्या हॉटेलांनीच सुरक्षेकडे लक्ष पुरवले आहे. उरलेल्यांनी सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना आखलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही शहरांतील नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे.