शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

‘अच्छे दिना’तही कावळे घटले, श्राद्धविधी संकटात

By admin | Updated: September 23, 2016 02:44 IST

कावळ्यांसाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. म्हणजेच पितृपक्ष सुरु आहे तरी रावण्या करूनही व इच्छित खाद्य, पेय ठेवले तरी ते पितरांसाठी ठेवलेल्या ताटाला स्पर्श करीत नसल्याने शेवटी

विक्रमगड : कावळ्यांसाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. म्हणजेच पितृपक्ष सुरु आहे तरी रावण्या करूनही व इच्छित खाद्य, पेय ठेवले तरी ते पितरांसाठी ठेवलेल्या ताटाला स्पर्श करीत नसल्याने शेवटी कंटाळलेल्या आप्तांना नैवेद्य दाखवून श्राद्वाचे भोजन खावे लागते आहे. याला कारण कावळ्यांची घटलेली संख्या ही आहे. कावळे कमी नैवेद्य जास्ती, त्यामुळे खायचे तरी किती? असा प्रश्न कावळ्यांना पडत असावा.गणेशोत्सवानंतर लगेचच पितृ पंधरवडा सुरु होतो़ या दिवसांत आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास ठेवण्याची) रुढी परंपरा खूप जुन्या काळापासुन आजही चालत आलेली असून ती ग्रामीण भागत नव्हे तर शहरी भागातही दिसते़ या दिवसांत पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची फळे, वस्तू आणि जेवण (मद्यसुद्धा) वाढून ते कावळयांच्या रुपाने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची परंपरा आहे़ त्यासाठी प्रत्येकजण आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या मृत्यू तिथीनुसार नैवेद्य देतो़ या दिवसांत महत्व असते ते कावळयांना. कावळा या नैवेद्याचा घास घेईतो घरातील कुणीही जेवणास बसत नाहीत़आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे़ एरवी मिळेल त्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पंधरवडयात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो़ सध्याच कावळयांची संख्याच कमी झाल्याने ़पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळयांना साद घातली तरी ते फिरकेनासे झाले आहेत़ त्यामुळे ब-यांचदा केवळ साकडे घालून किंवा पितरांना नैवैद्य दाखवून जेवण आटपावे लागते़ याचे घरातल्या बुजुर्गाना दु:ख वाटते़ (वार्ताहर)