शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

‘अच्छे दिना’तही कावळे घटले, श्राद्धविधी संकटात

By admin | Updated: September 23, 2016 02:44 IST

कावळ्यांसाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. म्हणजेच पितृपक्ष सुरु आहे तरी रावण्या करूनही व इच्छित खाद्य, पेय ठेवले तरी ते पितरांसाठी ठेवलेल्या ताटाला स्पर्श करीत नसल्याने शेवटी

विक्रमगड : कावळ्यांसाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. म्हणजेच पितृपक्ष सुरु आहे तरी रावण्या करूनही व इच्छित खाद्य, पेय ठेवले तरी ते पितरांसाठी ठेवलेल्या ताटाला स्पर्श करीत नसल्याने शेवटी कंटाळलेल्या आप्तांना नैवेद्य दाखवून श्राद्वाचे भोजन खावे लागते आहे. याला कारण कावळ्यांची घटलेली संख्या ही आहे. कावळे कमी नैवेद्य जास्ती, त्यामुळे खायचे तरी किती? असा प्रश्न कावळ्यांना पडत असावा.गणेशोत्सवानंतर लगेचच पितृ पंधरवडा सुरु होतो़ या दिवसांत आपल्या पूर्वजांना नैवेद्य (घास ठेवण्याची) रुढी परंपरा खूप जुन्या काळापासुन आजही चालत आलेली असून ती ग्रामीण भागत नव्हे तर शहरी भागातही दिसते़ या दिवसांत पितरांना अर्थात कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची फळे, वस्तू आणि जेवण (मद्यसुद्धा) वाढून ते कावळयांच्या रुपाने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची परंपरा आहे़ त्यासाठी प्रत्येकजण आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या मृत्यू तिथीनुसार नैवेद्य देतो़ या दिवसांत महत्व असते ते कावळयांना. कावळा या नैवेद्याचा घास घेईतो घरातील कुणीही जेवणास बसत नाहीत़आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे़ एरवी मिळेल त्यावर गुजराण करणारा हा पक्षी या पंधरवडयात खाऊन सुस्तावलेला दिसून येतो़ सध्याच कावळयांची संख्याच कमी झाल्याने ़पितरांच्या नैवेद्याला शिवण्यासाठी कावळयांना साद घातली तरी ते फिरकेनासे झाले आहेत़ त्यामुळे ब-यांचदा केवळ साकडे घालून किंवा पितरांना नैवैद्य दाखवून जेवण आटपावे लागते़ याचे घरातल्या बुजुर्गाना दु:ख वाटते़ (वार्ताहर)