शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

‘कोरोना वॉर्डमध्ये जाताना युद्धाला जाण्यासारखे वाटायचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST

ठाणे : कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात खूप गोंधळ उडाला होता. कोरोनाच्या उपचाराविषयी सरकारकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु कोरोना ...

ठाणे : कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात खूप गोंधळ उडाला होता. कोरोनाच्या उपचाराविषयी सरकारकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु कोरोना रुग्ण कसा असतो, हे कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे गोंधळ आणि रुग्णाची काळजी यात मी अडकले होते. वरिष्ठांनी मनोधैर्य वाढविले, तसे या संकटाशी दोन हात करण्याची ऊर्जा मिळाली. कोरोना वॅार्डमध्ये जाताना एखाद्या युद्धाला जात असल्यासारखे वाटत होते. या युद्धाशी लढणारे आम्ही जणू सैनिक असून, हे युद्ध कोणत्याही परिस्थीतीत जिंकायचेच, अशा भावना मनात यायच्या. आपल्या हातून अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी पोहोचले, याचे आज समाधान वाटते, अशी भावना सिव्हील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. वंदना पाटील यांनी व्यक्त केली.

डॉ. पाटील या कोरोना काळात आपल्या घरापासून तब्बल तीन महिने दूर होत्या. रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या कोरोना रुग्णावर त्यांनी उपचार केले. रुग्ण सेवा हीच इश्वर सेवा या उक्तिला त्या खऱ्या उतरल्या. त्यांचे अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, आम्ही एका कुटुंबासारखे काम करीत होतो. त्यामुळे एकमेकांचे सांत्वन करायचो. बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. कॅलेण्डर तर माहीत नव्हते. वार, तारीख लक्षात राहात नसत. सण - उत्सव कधी आले, हे कळलेही नाही. डोळ्यांसमोर एकच ध्येय होते. सिव्हील सर्जन डॉ. कैलाश पवार यांनी जेवणाची, राहण्याची आणि वाहनाची सोय केली होती. त्यामुळे आमच्यावरचा ताण कमी झाला होता. हळूहळू दिवस पुढे जात होते, रुग्णांची संख्या वाढत होती. इतर रुग्णालयांत

बेडही उपलब्ध नव्हते, अशा वेळी आम्ही कितीही रुग्ण पाठवा, त्यांच्यावर उपचार करायला तयार आहोत, या भूमिकेत होतो.

-----------------------------------------

जुलै ते सप्टेंबर सर्वात कठीण काळ

सुरुवातीला जो गोंधळ, दडपण आणि भीती होती ती अनुभवाने नाहीशी होत होती, मनही खंबीर होत होते. हॉस्पिटलमध्ये गेले की, पीपीई कीट घालायचे आणि काढले की, थेट गेटबाहेर पडायचे, असा आमचा दिनक्रम होता. सुरुवातीच्या काळात हॉटेलमध्ये निवासव्यवस्था होत नव्हती, तेव्हा घरी जायला लागायचे. ते दिवस मात्र मी तणावात जगले. राहण्याची सोय झाली, तेव्हा आपण घरच्यांपासून दूर आहोत, या विचाराने दिलासा मिळाला होता. कारण ते कुटुंब आणि सोसायटीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले होते. जुलै ते सप्टेंबर हा काळ सर्वात कठीण गेला. डिसेंबर महिन्यात घरी आले. आता काळजी मिटली आहे. संकटातून शिकत गेले. आपल्या हातून रुग्ण बरे होऊन जातात, हाच एक दागिना आहे, असे आता वाटत आहे.