शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अधिकृत बिल्डरांची ‘केडीएमसी’कडून गोची; नव्या नगर परिषदेच्या प्रक्रियेमुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:20 IST

विकास शुल्क घेण्यास नकार

कल्याण : केडीएमसीतील १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्याचा फटका या गावांमधील अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना बसला आहे. मनपाने त्यांच्या बांधकाम प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, परंतु त्यांच्याकडून विकास शुल्क घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बिल्डरांची गोची झाली आहे.

राज्य सरकारने केडीएमसीतील २७ पैकी १८ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची अधिसूचना काढली आहे. त्याबाबत हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविल्या होत्या. मात्र, ही गावे केडीएमसीत असताना अधिकृत बिल्डरांनी गावांमध्ये इमारती उभारण्यासाठी आराखडा मनपाच्या नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मनपानेही त्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून विकास शुल्क स्वीकारण्यास नकार दिला आहे. कारण, १८ गावे केडीएमसीतून वगळण्याच्या प्रक्रियेस २४ जूनला सुरुवात झाली आहे.

१८ गावांमधील नांदिवली येथे इमारत उभारण्यासाठी बांधकाम परवानगी बिल्डर मनोज राय यांनी महापालिकेकडे मागितली होती. मार्चमध्ये त्यांना मंजुरी मिळाली. त्यामुळे त्यांनी इमारतीसाठी एक कोटी २४ लाख रुपयांचे विकास शुल्क भरण्याची तयारी केडीएमसीच्या नगररचना विभागाकडे दर्शवली. मात्र, या विभागाने १८ गावे वगळण्यात येणार असल्याने ते शुल्क घेतले नाही. राज्य सरकार ही गावे कधी केडीएसीतून वगळते, तर कधी पुन्हा समाविष्ट करते. सरकारच्या धरसोड वृत्तीचा फटका अधिकृत बांधकाम करणाºया बिल्डरांना बसला असल्याचे राय यांनी सांगितले.

मग मंजुरीचे काय करायचे? बिल्डरांचा सवाल

लॉकडाऊनमुळे केडीएमसीच्या पाणीपट्टी व घरपट्टीच्या करवसुलीवर परिणाम झाला आहे. महापालिकेच्या तिजोरीत विकास शुल्कापोटी बºयापैकी रक्कम जमा होते. मग, आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विकास शुल्क स्वीकारण्याऐवजी नाकारणे कितपत योग्य आहे.विकास शुल्क भरायचे नाही, तर मंजुरीचे काय करायचे. त्याला दुसरा पर्याय प्रशासनाने दिलेला नाही. लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेटचा व्यवसाय मंदावला आहे. त्यात महापालिकेकडून केली जाणारी गोची अधिकच अडचणीची ठरत असल्याचे बिल्डरांनी सांगितले.

38,000 कोटींचा महसूल बुडाला

२७ गावांसाठी एमएमआरडीएने विकास आराखडा तयार केला होता. त्याला मूलत: मंजुरी मिळण्यासाठी २०१४ साल उजाडले. तर, दुसरीकडे २७ गावांमध्ये 79,000 पेक्षा जास्त बेकायदा बांधकामे उभी राहिली. त्यात घरे घेणाऱ्यांची अनेकांनी फसवणूक केली.याशिवाय, केवळ दोन वर्षांचा हिशेब केल्यास बेकायदा बांधकामांमुळे ३८ हजार कोटी रुपयांचा सरकारी महसूल बुडाला आहे. बेकायदा बांधकामांना मोकळे रान सोडून अधिकृत बिल्डरांची गोची करण्याचा हा प्रकार असल्याची ओरड अधिकृत बिल्डरांनी केली आहे.

१५ ते १८ कोटींचा महसूल बुडणार : केडीएमसीचे सहायक संचालक नगररचनाकार मा.द. राठोड म्हणाले की, १८ गावांमध्ये काही बिल्डरांना मार्चपूर्वी बांधकाम परवानगी दिली गेलेली आहे. सध्या त्यांच्याकडून विकास शुल्क घेणे बंद केले आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे शुल्क न घेतल्यास महापालिकेच्या तिजोरीत १५ ते २० कोटींचा कमी महसूल जमा होऊ शकतो. १८ गावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन सरकार जो काही निर्णय घेईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका