शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजय नव्हे तर विक्रम करणे हेच लक्ष्य होते; किसन कथोरे यांनी व्यक्त केली भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 23:17 IST

राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचे स्वप्न आपण पाहत होतो.

पंकज पाटील विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार हा विजयासाठी संघर्ष करत होता. मात्र, राज्यातील एकमेव उमेदवार आमदार किसन कथोरे हे असे होते की ते विजयासाठी नव्हे तर विक्रमी मताधिक्यासाठी प्रचार करत होते. यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव सहन करावा लागला. अशा परिस्थितीतही आ. कथोरे यांच्यावर मतदारांनी अपेक्षेप्रमाणे विक्रमी मतांच्या स्वरूपात विश्वास दर्शवला. या यशानंतर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

विक्रमी मताधिक्यासाठी निवडणूक लढवायची कल्पना कशी सुचली?२००४मध्ये अंबरनाथ मतदारसंघातून प्रथमच आमदार होण्याचा मान मिळाला. मतदारसंघाच्या विभाजनानंतर मुरबाड मतदारसंघात यावे लागले. त्यानंतर सलग तिसऱ्या वेळेला मुरबाडकरांनी आपल्यावर विश्वास दाखवला. दोन निवडणुका या आव्हानात्मक होत्या. त्यानंतर १० वर्षांत केलेली कामे ही जनतेपुढे होती. त्यामुळे एकतर्फी विजय आधीच निश्चित होता. मतदारांपुढे जाताना कोणते तरी अशक्य वाटणारे आव्हान घेऊन पुढे जावे असे मनात आले. मग निश्चय केला की यावेळी मतांची विक्रमी आघाडी घ्यायची.

राज्यातील तीन प्रमुख विजेत्यांमध्ये आल्यावर कसे वाटते?टक्केवारी कमी असली तरी मताधिक्याचे प्रमाण पाहिल्यावर आपण राज्यातील तीन प्रमुख विजेत्यांमध्ये आल्याचा आनंद वेगळा आहे. त्यातच युतीच्या आमदारांत सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थकी लावल्याचे समाधान आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी विशेष तयारी काय केली होती?मतदारसंघातील ग्रामीण भागावर विशेष लक्ष दिले. अनेक गावांना भेटी देऊन त्यांना मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली. शिवसेना आणि भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मतदारांना बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी यंत्रणाही राबवली.प्रचारासाठी एकही नेता न येण्याचे कारण?आचारसंहिता लागू होताच आपण कामाला लागलो होतो. बड्या नेत्यांच्या सभा व रॅलीसाठी पक्ष आग्रही होता. आपला विजय निश्चित असताना ती सभा इतर मतदारसंघात झाल्यास त्याचा तेथील उमेदवाराला लाभ होईल आणि भाजपची ताकदही वाढेल या हेतूने नेत्यांची सभा आपल्या मतदारसंघात न घेता ती इतरत्र देण्याचे आवाहन पक्षाला केले होते. तसेच यंदाच्या प्रचारात तळागळातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना ताकद देण्याचे काम आपण केले आहे. त्यामुळे हा विजय विक्रमी ठरला आहे.राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचे स्वप्न आपण पाहत होतो. मुरबाड ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने आले. त्या तुलनेत बदलापूर शहरात ते कमी होते. ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले असते तर हे स्वप्न पूर्ण झाले असते.

टॅग्स :BJPभाजपाmurbad-acमुरबाड