शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

विजय नव्हे तर विक्रम करणे हेच लक्ष्य होते; किसन कथोरे यांनी व्यक्त केली भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 23:17 IST

राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचे स्वप्न आपण पाहत होतो.

पंकज पाटील विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार हा विजयासाठी संघर्ष करत होता. मात्र, राज्यातील एकमेव उमेदवार आमदार किसन कथोरे हे असे होते की ते विजयासाठी नव्हे तर विक्रमी मताधिक्यासाठी प्रचार करत होते. यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव सहन करावा लागला. अशा परिस्थितीतही आ. कथोरे यांच्यावर मतदारांनी अपेक्षेप्रमाणे विक्रमी मतांच्या स्वरूपात विश्वास दर्शवला. या यशानंतर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

विक्रमी मताधिक्यासाठी निवडणूक लढवायची कल्पना कशी सुचली?२००४मध्ये अंबरनाथ मतदारसंघातून प्रथमच आमदार होण्याचा मान मिळाला. मतदारसंघाच्या विभाजनानंतर मुरबाड मतदारसंघात यावे लागले. त्यानंतर सलग तिसऱ्या वेळेला मुरबाडकरांनी आपल्यावर विश्वास दाखवला. दोन निवडणुका या आव्हानात्मक होत्या. त्यानंतर १० वर्षांत केलेली कामे ही जनतेपुढे होती. त्यामुळे एकतर्फी विजय आधीच निश्चित होता. मतदारांपुढे जाताना कोणते तरी अशक्य वाटणारे आव्हान घेऊन पुढे जावे असे मनात आले. मग निश्चय केला की यावेळी मतांची विक्रमी आघाडी घ्यायची.

राज्यातील तीन प्रमुख विजेत्यांमध्ये आल्यावर कसे वाटते?टक्केवारी कमी असली तरी मताधिक्याचे प्रमाण पाहिल्यावर आपण राज्यातील तीन प्रमुख विजेत्यांमध्ये आल्याचा आनंद वेगळा आहे. त्यातच युतीच्या आमदारांत सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थकी लावल्याचे समाधान आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी विशेष तयारी काय केली होती?मतदारसंघातील ग्रामीण भागावर विशेष लक्ष दिले. अनेक गावांना भेटी देऊन त्यांना मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली. शिवसेना आणि भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मतदारांना बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी यंत्रणाही राबवली.प्रचारासाठी एकही नेता न येण्याचे कारण?आचारसंहिता लागू होताच आपण कामाला लागलो होतो. बड्या नेत्यांच्या सभा व रॅलीसाठी पक्ष आग्रही होता. आपला विजय निश्चित असताना ती सभा इतर मतदारसंघात झाल्यास त्याचा तेथील उमेदवाराला लाभ होईल आणि भाजपची ताकदही वाढेल या हेतूने नेत्यांची सभा आपल्या मतदारसंघात न घेता ती इतरत्र देण्याचे आवाहन पक्षाला केले होते. तसेच यंदाच्या प्रचारात तळागळातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना ताकद देण्याचे काम आपण केले आहे. त्यामुळे हा विजय विक्रमी ठरला आहे.राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचे स्वप्न आपण पाहत होतो. मुरबाड ग्रामीण भागात मतदार मोठ्या संख्येने आले. त्या तुलनेत बदलापूर शहरात ते कमी होते. ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले असते तर हे स्वप्न पूर्ण झाले असते.

टॅग्स :BJPभाजपाmurbad-acमुरबाड