शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘रस्ते प्रकल्पबाधितांना घरे द्या’, झोपडीधारकांना घरे देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 01:00 IST

बीएसयूपी प्रकल्प : नालासोपाऱ्यातील झोपडीधारकांना घरे देण्यास विरोध

कल्याण : केडीएमसीने बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेली घरे महापालिका हद्दीतील रस्ते प्रकल्पबाधितांना अद्याप दिलेली नाहीत. मात्र, नालासोपारा येथे रेल्वेमुळे बाधित झालेल्या झोपडीधारकांना ही घरे देण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे. ही घरे झोपडीधारकांना न देता आधी आम्हाला द्यावीत, अशी मागणी प्रकल्पबाधितांनी केली आहे.

केडीएमसीने पत्रीपूल ते दुर्गाडी बायपास रस्त्यासाठी २००५ मध्ये व २०१० मध्ये घरे तोडली होती. या प्रकल्पबाधितांना बीएसयूपी योजनेत घरे दिली जातील, असे सांगितले होते. मात्र, हा रस्ता वाहतुकीस खुला होऊनही प्रकल्पबाधितांना अद्याप ही घरे दिलेली नाहीत. सध्या ही घरे धूळखात पडली आहेत. महापालिकेने केवळ १५०० लाभार्थ्यांना घरांचे वाटप केले आहे. उर्वरित साडेपाच हजार घरांपैकी तीन हजार घरे पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केली आहे. मात्र, त्याचा डिमांड सर्व्हे दोन वर्षांपासून केवळ निविदा काढण्याच्या प्रक्रियेपुरताच मर्यादित राहिला आहे.

महापालिकेने वाटप केलेली दीड हजार घरे व पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केलेली तीन हजार घरे वगळता महापालिकेकडे अडीच हजार घरे शिल्लक होती. रेल्वेकडून दिल्ली ते जेएनपीटी हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प राबविला जात असून, त्यात महापालिका हद्दीतील ८४० जणांची घरे बाधित होत आहेत. त्यामुळे त्यांना घरे देण्याचा अध्यादेशच राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये काढला आहे. परंतु, या घरांची रक्कम रेल्वेकडून महापालिकेस दिली जाणार आहे. त्यानंतरही महापालिकेकडे एक हजार ६६० घरे शिल्लक राहतात. परंतु, या घरांसाठी लाभार्थी ठरविलेले नसले, तरी महापालिका हद्दीतील रस्ते प्रकल्पबाधितांना ही घरे दिली जाणार आहेत. मात्र, त्याची पूर्तता महापालिकेने केली नसल्याचा मुद्दा शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी उपस्थित केला आहे.प्रकल्पबाधितांना कचोरे येथील बीएसयूपीतील घरे न देता नालासोपारा येथील रेल्वेबाधित झोपडीधारकांना देण्याचा घाट घातला जात आहे. हा महापालिका हद्दीतील प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. महापालिकेने त्यांना घरे देण्याचा प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित ठेवला आहे. रेल्वे राज्य सरकारद्वारे महापालिकेवर दबाव आणून महापालिका हद्दीतील प्रकल्पबाधितांना घरांपासून वंचित ठेवण्याचा डाव साधत आहे....तर टाळे तोडून ताबा घेऊच्एखादा निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागतो. नागरिकांचा जाहीरनामा महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. मात्र, तो केवळ नावाला आहे. त्याची पूर्तता केली जात नाही.च् या प्रकरणात महिला आघाडीच्या कचोरे विभागप्रमुख सनम शेख यांनीही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. हा प्रश्न विविध ठिकाणी मांडला आहे. मात्र, त्यांच्या पाठपुराव्यास प्रशासन दाद देत नाही.च् शेख यांनी आता पुन्हा याप्रकरणी महापालिका आयुक्त, टिळकनगर पोलीस ठाणे आणि खासदारांना निवेदन दिले आहे. घरे देणार नसतील तर घराचे टाळे तोडून घराचा ताबा घेतला जाईल, असा इशाराही महिला आघाडीने दिला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणHomeघर