शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना महिनाभरात घरे द्या, आमदार बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 02:38 IST

केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंतर्गत शहरातील गरिबांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने बांधलेली घरे लाभार्थ्यांना दिली जात नाही.

कल्याण : केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंतर्गत शहरातील गरिबांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने बांधलेली घरे लाभार्थ्यांना दिली जात नाही. ही घरे महिनाभरात न दिल्यास लाभार्थ्यांसह त्यात घुसून ताबा घेतला जाईल, असा सज्जड इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिला.प्रहार संघटनेतर्फे सागर इंटरनॅशनल हॉटेलच्या सभागृहात बीएसयूपी व विविध प्रकल्पात बाधित झालेल्या लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यास कडू उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी वरील इशारा दिला.कडू यांनी सांगितले की, ‘बीएसयूपी योजनेंतर्गत घरे बांधून तयार आहेत. लाभार्थी सात वर्षांपासून घरांच्या प्रतीक्षेत आहे. घरांच्या चाव्या त्यांना दिल्या जात नाहीत. लाभार्थ्यांची यादी निश्चित केली जात नाही. महापालिकेचे अधिकारी व प्रशासन त्यांच्यावर अन्याय करत आहे. प्रशासनाने महिनाभरात लाभार्थ्यांना घरे द्यावीत, अन्यथा प्रहार संघटनेतर्फे महिनाभरात लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. खऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराचा ताबा मे महिन्यात मिळवून दिला जाईल. त्यासाठी घरात घुसण्याची वेळ आली, तरी ते आंदोलन केले जाईल.’कडू पुढे म्हणाले, ‘शहराचे नाव कल्याण आहे. मात्र, शहरात सगळे काही अकल्याणसारखे दिसत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा पुरवणे सरकारची जबाबदारी आहे. लोकांना अन्न मिळत नाही. आता घरेही मिळाळेली नाही. घर मिळण्यासाठी गरिबाला ७० वर्षे वाट पाहावी लागते, यासारखी दुसरी खेदाची गोष्ट नाही.’यापूर्वीच्या काँग्रेस सरकारकडून घरकुल योजना राबवताना गुणांकाच्या आधारे घर दिले जात होते. ज्याला जितके गुण कमी त्याला घर मिळायचे. एक गुणही कमी मिळाला तर त्याला घर मिळत नव्हते.आता मोदी सरकारने सगळ्यांना घर देण्याचा वायदा करून पंतप्रधान आवास योजना आणली. गुणांकाऐवजी अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी केली आहे. या वर्गवारीची फोड करताना कडू यांनी सांगितले की, ‘अ’ म्हणजे पूर्ण गावची यादी, ‘ब’ म्हणजे पात्र लाभार्थी, ‘क’ म्हणजे कधीच मिळणार नाही आणि ‘ड’ म्हणजे मेल्यावरच घर मिळेल, असे उपरोधिक उदाहरण देत पंतप्रधान आवास योजना पुरती फसलेली असल्याची टीका कडू यांनी केली.