शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

जिल्ह्यात मुलींची बाजी

By admin | Updated: May 27, 2015 22:53 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे.

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. यात रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के लागला असून सर्वच तालुक्यांत मुलींनी बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी निकाल ४७.०५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, मुरुड, माणगांव, श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड या सात तालुक्यांचा निकाल ९० टक्केपेक्षा अधिक तर उरण, कर्जत, सुधागड, पेण, रोहा, तळा व पोलादपूर तालुक्याचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. केवळ खालापूर तालुका काहीसा पिछाडीवर गेला असून या तालुक्याचा निकाल ७६.९२ टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातील बारावीसाठी १४ हजार ९५३ मुले तर १३ हजार ५३८ मुली असे एकूण २८ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार ९४५ मुले तर १२ हजार ७९९ मुली असे एकूण २५ हजार ७४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ८६.५७ टक्के मुले तर ९४.५४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के आहे. जिल्ह्यात २ हजार ४३८ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १ हजार १४७ उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ४७.०५ टक्के आहे.विज्ञान शाखा निकालात प्रथम क्रमांकावर असून या शाखेचा निकाल ९४.३१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील एकूण २८ हजार ४९१ परीक्षार्थींमध्ये विज्ञान शाखेचे ९ हजार ५८४ परीक्षार्थी होते. त्यापैकी ४३४ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २ हजार ३५९ प्रथम, ५ हजार ७०१ द्वितीय तर ५४५ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ९ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५० टक्के लागला असून एकूण ९ हजार ६९९ परीक्षार्थींपैकी ६८६ विशेष गुणवत्ता श्रेणीत, ३ हजार २२१ प्रथम, ४ हजार ५८८ व्दितीय तर ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ८ हजार ९७२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उच्च व्यवसाय अभ्यास (व्होकेशनल) शाखा निकालात तृतीय क्रमांकावर असून ८८.९५ टक्के निकाल लागला आहे. या शाखेचे ८६९ परीक्षार्थी होते, पैकी २२ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २४८ प्रथम, ४८७ व्दितीय, १६ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ७७३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेचा निकाल ८३.४६ टक्के लागला आहे. या शाखेत एकूण ८ हजार ३३९ परीक्षार्थी होते, पैकी ११९ विशेष गुणवत्ता श्रेणीत, १ हजार ६८४ प्रथम, ४ हजार ३८७ द्वितीय, ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ६ हजार ९६० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल बुधवारी जाहीर झाला. येथील कोएसोच्या कै. सरेमल प्रतापमल जैन उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ८१.४९ टक्के लागला. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेचे परीक्षेस बसलेले ३६२ पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ७३ टक्के इतका लागला असून ४३ पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून शिमना अक्र म अन्सारी (प्रथम), झैबा अनिस अधिकारी (द्वितीय)आणि रफत हमीद चोरडेकर (तृतीय) तर वाणिज्य शाखेतून मोईन महमद चोगले (प्रथम), असद सलीम शिंदी (द्वितीय), माज मिर्झा पठाण (तृतीय) असे क्र मांक मिळविले. येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी.परमार इंग्लिश स्कूलचा निकाल ६४ टक्के लागला असून २८ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत आकांक्षा चौधरी (प्रथम), कौशल पटेल (द्वितीय) आले आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ९३.२४ टक्केकोकणातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोयायटीचा निकाल ९३.२४ टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी दिली. संस्थेच्या १२ कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ७ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९३.२४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अलिबाग येथील केईएस इंग्रजी मिडीयम कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.