शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

जिल्ह्यात मुलींची बाजी

By admin | Updated: May 27, 2015 22:53 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे.

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. यात रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के लागला असून सर्वच तालुक्यांत मुलींनी बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी निकाल ४७.०५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, मुरुड, माणगांव, श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड या सात तालुक्यांचा निकाल ९० टक्केपेक्षा अधिक तर उरण, कर्जत, सुधागड, पेण, रोहा, तळा व पोलादपूर तालुक्याचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. केवळ खालापूर तालुका काहीसा पिछाडीवर गेला असून या तालुक्याचा निकाल ७६.९२ टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातील बारावीसाठी १४ हजार ९५३ मुले तर १३ हजार ५३८ मुली असे एकूण २८ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार ९४५ मुले तर १२ हजार ७९९ मुली असे एकूण २५ हजार ७४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ८६.५७ टक्के मुले तर ९४.५४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के आहे. जिल्ह्यात २ हजार ४३८ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १ हजार १४७ उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ४७.०५ टक्के आहे.विज्ञान शाखा निकालात प्रथम क्रमांकावर असून या शाखेचा निकाल ९४.३१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील एकूण २८ हजार ४९१ परीक्षार्थींमध्ये विज्ञान शाखेचे ९ हजार ५८४ परीक्षार्थी होते. त्यापैकी ४३४ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २ हजार ३५९ प्रथम, ५ हजार ७०१ द्वितीय तर ५४५ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ९ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५० टक्के लागला असून एकूण ९ हजार ६९९ परीक्षार्थींपैकी ६८६ विशेष गुणवत्ता श्रेणीत, ३ हजार २२१ प्रथम, ४ हजार ५८८ व्दितीय तर ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ८ हजार ९७२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उच्च व्यवसाय अभ्यास (व्होकेशनल) शाखा निकालात तृतीय क्रमांकावर असून ८८.९५ टक्के निकाल लागला आहे. या शाखेचे ८६९ परीक्षार्थी होते, पैकी २२ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २४८ प्रथम, ४८७ व्दितीय, १६ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ७७३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेचा निकाल ८३.४६ टक्के लागला आहे. या शाखेत एकूण ८ हजार ३३९ परीक्षार्थी होते, पैकी ११९ विशेष गुणवत्ता श्रेणीत, १ हजार ६८४ प्रथम, ४ हजार ३८७ द्वितीय, ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ६ हजार ९६० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल बुधवारी जाहीर झाला. येथील कोएसोच्या कै. सरेमल प्रतापमल जैन उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ८१.४९ टक्के लागला. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेचे परीक्षेस बसलेले ३६२ पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ७३ टक्के इतका लागला असून ४३ पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून शिमना अक्र म अन्सारी (प्रथम), झैबा अनिस अधिकारी (द्वितीय)आणि रफत हमीद चोरडेकर (तृतीय) तर वाणिज्य शाखेतून मोईन महमद चोगले (प्रथम), असद सलीम शिंदी (द्वितीय), माज मिर्झा पठाण (तृतीय) असे क्र मांक मिळविले. येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी.परमार इंग्लिश स्कूलचा निकाल ६४ टक्के लागला असून २८ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत आकांक्षा चौधरी (प्रथम), कौशल पटेल (द्वितीय) आले आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ९३.२४ टक्केकोकणातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोयायटीचा निकाल ९३.२४ टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी दिली. संस्थेच्या १२ कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ७ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९३.२४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अलिबाग येथील केईएस इंग्रजी मिडीयम कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.