शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कन्या शाळेचा भूखंड बिल्डरच्या घशात, शिक्षणाचे बाजारीकरण, पटसंख्येअभावी जिल्ह्यातील दहा शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 06:02 IST

गरीब मुलींसाठी ठाणे शहरात जिल्हा परिषदेची एक ब्रिटीशकालीन कन्या शाळा आहे. मात्र, तिची इमारत तोडण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे : गरीब मुलींसाठी ठाणे शहरात जिल्हा परिषदेची एक ब्रिटीशकालीन कन्या शाळा आहे. मात्र, तिची इमारत तोडण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. इमारतीच्या रिकाम्या जागेचे काय करणार याचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही कोट्यवधींची जागा बिल्डरच्या घशात घालण्याच्या हालचाली काही अधिकाºयांनी राजकीय नेत्यांच्या मदतीने सुरू केल्याचे समजते. तेथील विद्यार्थीनींसह बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.जि.प.तील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिपच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागातील सुमारे एक हजार ३६३ शाळा शंभर टक्के डिजिटल केल्याचा दावा करून ९५० शाळा प्रगत केल्याचे त्यांनी नमूद केले. यास अनुसरून शहरात असलेली ब्रिटीशकालीन जिल्हा परिषदेची कन्या शाळा डिजिटल का झाली नाही, या विषयी विचारले असता ही इमारत तोडणार असल्याचे भीमनवार यांच्यासह शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. शाळा तोडल्यानंतर संबंधीत भूखंडाचा वापर कशासाठी करणार, यावर मात्र समाधानकारक उत्तर देता आले नाही. जिल्हा परिषदेत येणाºया लोकप्रतिनिधींची बॉडी आल्यावर त्याचा काय तो विचार करणार असल्याचे शेंडकर म्हणाल्या. चांगल्या कामांमुळे राज्यपालानी पुुरस्कृत केलेल्या शेंडकर यांना जिल्हा परिषदेची ही शाळा ठाणे महापालिकेत वर्ग केल्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी ‘आम्ही तर काही प्रस्ताव दिलेला नाही ’ असे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळले. शाळेच्या या भूखंडाचा वापर कशासाठी करणार... मुलांना अन्य शाळेत स्थलांतरीत करणार काय... यावरून विद्यार्थी महापालिकेसह अन्य शाळांमध्ये समाविष्ट होण्याची भनक शिक्षणाधिकाºयांना नसल्याचे निदर्शनात आले.एकीकडे महिला व मुलींच्या सबलीकरणसाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. तर दुसरीकडे गरीब, दीन दलितांच्या मुली शिक्षण घेत असलेली कन्या शाळा तोडून तिचा भूखंड जिल्हा परिषद मोकळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून उघड झाले. ‘लेक शिकवा’ हा शासनाचा उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद ग्रामीण भागाप्रमाणे कन्या शाळेला डिजिटल न करता तीला आगामी सहा महिन्यात तोडण्याचे नियोजन आहे. तसेच विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यातील दहा शाळा झाल्या बंद झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.यामुळे हक्काच्या शाळेपासून वंचित होणाºया ठाणे शहरातील सावित्रीच्या लेकींना शहरातील महागड्या शाळेत शिक्षण घेणे शक्य होणार नसल्याचे आजच्या शिक्षणाच्या बाजारीकरणावरून उघड होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेच्या सुमारे दहा शाळा मागील वर्षात बंद पडल्याचे या पत्रकार परिषदेत उघड झाले. विद्यार्थी संख्येअभावी जवळच्या तीन किलोमीटरच्या शाळेत या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले.प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहितीशासनाच्या धोरणानुसार दरवर्षी हा कार्यक्रम राबवताना विद्यार्थ्याच्या वाहन व्यवस्थेचीदेखील काळजी घेतली जात असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ९५ हजार शौचालये बांधून जिल्हा शंभर टक्के हागणदरीमुक्त होत आहे, नादुरूस्ती शौचालयांची दुरुस्ती, ६५ ग्रामपंचायतींच्या विकास कामांचे आराखडे, गावातील शाळांच्या वीजपुरवठ्याचे बील भरण्यासह साफसफाई व शौचालय देखभालीची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली. घरकूल बांधणीत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून बहुतांशी घरकूल बांधून पूर्ण झाले. विविध करणांनी रखडलेल्या सुमारे १८८ पाणीपुरवठा योजनांचे कामे पूर्ण करण्यात आले. सॅम, मॅमचे बालके कुपोषणातून मुक्त करण्याची प्रगती आदी विषयांची माहिती दिली. 

टॅग्स :Schoolशाळा