शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पत्रीपुलाचे गर्डर मार्चअखेर बसवणार, एप्रिलमध्ये कल्याण डोंबिवलीकरांची कोंडीतून मुक्ती होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 20:42 IST

मध्य रेल्वेने नियोजनानुसार दोन ब्लॉक दिल्यानंतर गर्डर प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागी ठेवणे सोपे जाणार आहे.

डोंबिवली - पत्रीपुलाच्या गर्डरचे भाग येण्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून, 7 टप्प्यांमध्ये हैदराबाद येथून कल्याणला टेलर कंटेनरमधून ते भाग येणार आहेत. सुमारे 8० मेट्रिक टन वजनांचे लोखंडी गर्डरचे भाग शहरात येत असल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु होती. पहिला भाग आल्यावर सोशल मीडियावर नागरिकांनी गर्डर आले पण ते वेळेत जोडा आणि दिलासा द्या, अशी मागणी केली. सगळे भाग आल्यावर मार्च अखेरीस ते लावण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती एमएसएआरडीसीच्या अधिका-यांनी ‘लोकमत’ला दिली.मध्य रेल्वेने नियोजनानुसार दोन ब्लॉक दिल्यानंतर गर्डर प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागी ठेवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे आता एकीकडे गर्डर येत असतांनाच दुसरीकडे रेल्वे ब्लॉक कधी, किती तासांचे देते यासंदर्भातही एमएसआरडीसीच्या यंत्रणोला पाठपुरावा करावा लागणार आहे. टेलरमधून गर्डरचे भाग आल्यानंतर ते कल्याणमध्ये प्रकल्पाच्या मोकळया जागेत ठेवण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. सगळे भाग आल्यानंतर त्यांचे एकत्रिकरण करून 75 आणि 35 अशा दोन टप्प्यात तांत्रिक काम करून ते जोडण्यात येतील. त्यानंतर आधी त्याची चाचणी होईल, आणि नंतरच प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागेत ते ठेवण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.सगळे भाग यायला सुमारे आठ ते दहा दिवस त्यानंतर पुढील तीन आठवडे जोडणीसाठी आणि त्यानंतर मार्च अखेरीस प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या एमएसआरडीसी, रेल्वे प्रशासन यांच्या नियोजनानुसार कोणताही अडथळा न येता काम झाल्यास पत्रिपुलाचे लोकार्पण ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नियोजनानुसार प्रकल्प बांधून लोकार्पण झाल्यास गेले दीड वर्ष पत्रीपुलावर तासन्तास वाहतूक कोंडीत अडकणा-या कल्याण डोंबिवलीच्या वाहनचालकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली