शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

घोडबंदर टोलनाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 15:39 IST

toll plaza : ठाणे - घोडबंदर महामार्गाच्या रुंदीकरण, विकास व देखभालीच्या अनुषंगाने टोल वसुली सुरू झाली होती.

मीरारोड : वरसावे नाक्या जवळील घोडबंदर महामार्गावर असलेला वाणिज्य वाहनांसाठीचा टोल नाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात येऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

ठाणे - घोडबंदर महामार्गाच्या रुंदीकरण, विकास व देखभालीच्या अनुषंगाने टोल वसुली सुरू झाली होती. परंतु सदर टोल मीरा भाईंदर व ठाणे हद्दीवर न ठेवता वरसावे नाक्याजवळ आणून टोलनाका बसवला होता. त्यामुळे ठाणेकरांना टोल नाही तर मीरा भाईंदरच्या नागरिकांना मात्र टोल भुर्दंड सहन करावा लागत होता. काही वर्षांपूर्वी सदर टोलनाक्या वर वाणिज्य वापराच्या मालवाहू वाहनांव्यतिरिक्त अन्य मोटार आदी वाहनांना टोलमधून सूट मिळाली. परंतु मालवाहू अवजड वाहनांच्या टोल वसुलीमुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असे. रात्रीच्या वेळी तर ठाण्यावरून येताऱ्या वाहनांची  प्रचंड रांग लागत असे. 

दरम्यान, घोडबंदर टोल वसुलीचा १५ वर्षांचा करार २४ डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात आला होता. परंतु ठेकेदाराने लॉकडाऊनमुळे नुकसान झाल्याचे सांगत मुदतवाढ मागितली होती. त्या नुसार ठेकेदारास ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. सदर मुदतवाढीच्या विरोधात शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुदतवाढ रद्द करण्याची विनंती केली होती. 

दुसरीकडे, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत, सचिव हेमंत जुईकर, शहर संघटक दिनेश कनावजे आदींनी टोलची मुदतवाढ रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदींसह प्रशासनाकडे केली होती. शासनाने सदर टोल नाका दिलेल्या मुदतवाढीच्या एक महिना आधीच म्हणजे २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाMira Bhayanderमीरा-भाईंदर