शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

घोडबंदर मार्गाची वाहतुक कोंडीतून होणार सुटका, शासनाने दिला उन्नत मार्गाला ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 17:33 IST

घोडबंदर भागाची वाहतुक कोंडी आता सुटणार आहे. शासनाने या मार्गावर उन्नत मार्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार या मार्गासाठी ६६७.३७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुंबई - अहमदाबाद महामार्गाचा प्रवास होणार सुकर४.४ किमी लांबीचा तयार होणार उन्नत मार्गडीएफबीओटी तत्वावर केले जाणार काम

ठाणे - ठाणे शहरातून जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग घोडबंदर पट्टा हा चारपदरी असल्याने या भागामध्ये वाहनांना मोठ्या कोंडीला सामोर जावे लागत होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असल्यामुळे या भागामध्ये जमीन अधिग्रहण करून रस्ता रु ंदीकरण करणेही शक्य नव्हते. त्यामुळे या भागामध्ये उन्नत मार्ग उभारण्याच्या प्रस्तावाची मागील वर्षभर चाचणी सुरु होती. अखेर या ठिकाणी उन्नत मार्ग सुरु करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. या मार्गामुळे येथील वाहतुक कोंडी दुर होण्यास मदत होणार आहे. या मार्गासाठी ६६७.३७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला शासनाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या महामार्गाविषयीचे काम केले जाणार असून हा प्रकल्प संकल्पन-वित्त पुरवठा-बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (डीएफबीओटी) तत्वावर बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूरबावडी ते गायमुख मार्गावर हा रस्ता होणार आहे.एमएमआरडीएच्या माध्यमातून घोडबंदर रस्त्याचे रु ंदीकरण करण्यात आले असून डिसेंबर २००२ साली हे काम पुर्ण झाले होते. परंतु या महामार्गावरील गायमुखच्या दिशेकडील रस्त्याचे चार पदरीकरण करण्यात आले नसल्याने येथे नेहमीच वाहतुक कोंडी होत असते. नवी मुंबईकडून येणारी अवजड वाहने आणि कंटनेर रस्त्यात बंद पडल्यास अथवा अपघात घडल्यास या महामार्गावर पर्यायी रस्ता नसल्याने वाहन चालकांना तासनतास ताटकळत राहावे लागत असल्याची परिस्थिती आहे. वाहतुक कोंडीचे हे प्रमाण वाढत असताना या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. परंतु रस्त्याच्या दुतर्फा झालेले नागरीकरण आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानाचा भाग या रस्त्याच्या लगत असल्याने रस्ता रुंद करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या भागामध्ये उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता. त्या संदर्भामध्ये २४ नोव्हेंबर रोजी निर्णय घेण्यात आला असून या भागात ४.४ किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संकल्प-वित्तपुरवाठ-बांधा-वापरा-हस्तांतरीत करा या तत्वावर हा रस्ता बांधण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या संदर्भातील कार्यवाही करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाटी ६६७. ३७ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाGovernmentसरकार