शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदरला हवे १०० दशलक्ष लीटर पाणी; सुर्या धरणातून पाणी मिळावे, सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By अजित मांडके | Updated: January 31, 2024 16:27 IST

घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती.

ठाणे :  घोडबंदरचा पाणी प्रश्न मागील काही दिवसापासून चांगलाच गाजत आहे. घोडबंदरला १० दशलक्ष लीटर पाणी वाढवून देण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु केवळ पाच एमएलडी पाणी हे पुरेसे नसून घोडबंदरला १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार सुर्या धरणातून ठाण्याला १०० दशलक्ष लीटर पाणी मिळाले तर भविष्यातील पाण्याची तहान भागविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर सरनाईक यांना छेडले असता, संजय केळकर आणि माझा मतदार संघ हा लागूनच आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदरला पाणी टंचाई ही आजही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा आणि माझा पाण्या संदर्भातील प्रश्न हा एकच आहे, त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आहे, असे नाही. 

घोडबंदर भागात टँकर माफीया देखील फोफावले आहे, ही देखील वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात ५ एमएलडी पाणी पुरवठा वाढवून देण्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र १० एमएलडी वाढीव पाणी पुरवठा दिला तरी देखील घोडबंदरचा पाणी प्रश्न सुटणार नाही. केवळ या वाढीव पाण्यामुळे केळकर यांच्या घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागापर्यंतचा पाणी प्रश्न सुटेल मात्र संपूर्ण घोडबंदरचा सुटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

येथील पाणी पुरवठा सुरळीत करायचा असेल तर त्यासाठी घोडबंदरला एकूण १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. सुर्या प्रकल्पातून मिराभार्इंदर यावर्षी पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच वसई विरारला देखील केला जाणार आहे, या दोन महापालिकांना पाणी दिल्यानंतर जे अतिरिक्त पाणी आहे, त्यातील १०० दशलक्ष लीटर पाणी हे ठाण्यासाठी मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यातील ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धरणाचा प्रश्न देखील येत्या काळात मार्गी लागेल परंतु त्याला काहीसा वेळ लागणार असल्याने सुर्या प्रकल्प पाणी पुरवठा योजनेतून पाणी घेणे शक्य असल्याने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEknath Shindeएकनाथ शिंदेDamधरण