शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

घोडबंदरला हवे १०० दशलक्ष लीटर पाणी; सुर्या धरणातून पाणी मिळावे, सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By अजित मांडके | Updated: January 31, 2024 16:27 IST

घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती.

ठाणे :  घोडबंदरचा पाणी प्रश्न मागील काही दिवसापासून चांगलाच गाजत आहे. घोडबंदरला १० दशलक्ष लीटर पाणी वाढवून देण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु केवळ पाच एमएलडी पाणी हे पुरेसे नसून घोडबंदरला १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार सुर्या धरणातून ठाण्याला १०० दशलक्ष लीटर पाणी मिळाले तर भविष्यातील पाण्याची तहान भागविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर सरनाईक यांना छेडले असता, संजय केळकर आणि माझा मतदार संघ हा लागूनच आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदरला पाणी टंचाई ही आजही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा आणि माझा पाण्या संदर्भातील प्रश्न हा एकच आहे, त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आहे, असे नाही. 

घोडबंदर भागात टँकर माफीया देखील फोफावले आहे, ही देखील वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात ५ एमएलडी पाणी पुरवठा वाढवून देण्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र १० एमएलडी वाढीव पाणी पुरवठा दिला तरी देखील घोडबंदरचा पाणी प्रश्न सुटणार नाही. केवळ या वाढीव पाण्यामुळे केळकर यांच्या घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागापर्यंतचा पाणी प्रश्न सुटेल मात्र संपूर्ण घोडबंदरचा सुटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

येथील पाणी पुरवठा सुरळीत करायचा असेल तर त्यासाठी घोडबंदरला एकूण १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. सुर्या प्रकल्पातून मिराभार्इंदर यावर्षी पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच वसई विरारला देखील केला जाणार आहे, या दोन महापालिकांना पाणी दिल्यानंतर जे अतिरिक्त पाणी आहे, त्यातील १०० दशलक्ष लीटर पाणी हे ठाण्यासाठी मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यातील ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धरणाचा प्रश्न देखील येत्या काळात मार्गी लागेल परंतु त्याला काहीसा वेळ लागणार असल्याने सुर्या प्रकल्प पाणी पुरवठा योजनेतून पाणी घेणे शक्य असल्याने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEknath Shindeएकनाथ शिंदेDamधरण