शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

घोडबंदरला हवे १०० दशलक्ष लीटर पाणी; सुर्या धरणातून पाणी मिळावे, सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By अजित मांडके | Updated: January 31, 2024 16:27 IST

घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती.

ठाणे :  घोडबंदरचा पाणी प्रश्न मागील काही दिवसापासून चांगलाच गाजत आहे. घोडबंदरला १० दशलक्ष लीटर पाणी वाढवून देण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. परंतु केवळ पाच एमएलडी पाणी हे पुरेसे नसून घोडबंदरला १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार सुर्या धरणातून ठाण्याला १०० दशलक्ष लीटर पाणी मिळाले तर भविष्यातील पाण्याची तहान भागविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर सरनाईक यांना छेडले असता, संजय केळकर आणि माझा मतदार संघ हा लागूनच आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदरला पाणी टंचाई ही आजही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा आणि माझा पाण्या संदर्भातील प्रश्न हा एकच आहे, त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आहे, असे नाही. 

घोडबंदर भागात टँकर माफीया देखील फोफावले आहे, ही देखील वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात ५ एमएलडी पाणी पुरवठा वाढवून देण्याचे आयुक्तांनी सांगितले. मात्र १० एमएलडी वाढीव पाणी पुरवठा दिला तरी देखील घोडबंदरचा पाणी प्रश्न सुटणार नाही. केवळ या वाढीव पाण्यामुळे केळकर यांच्या घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागापर्यंतचा पाणी प्रश्न सुटेल मात्र संपूर्ण घोडबंदरचा सुटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

येथील पाणी पुरवठा सुरळीत करायचा असेल तर त्यासाठी घोडबंदरला एकूण १०० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. सुर्या प्रकल्पातून मिराभार्इंदर यावर्षी पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच वसई विरारला देखील केला जाणार आहे, या दोन महापालिकांना पाणी दिल्यानंतर जे अतिरिक्त पाणी आहे, त्यातील १०० दशलक्ष लीटर पाणी हे ठाण्यासाठी मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यातील ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धरणाचा प्रश्न देखील येत्या काळात मार्गी लागेल परंतु त्याला काहीसा वेळ लागणार असल्याने सुर्या प्रकल्प पाणी पुरवठा योजनेतून पाणी घेणे शक्य असल्याने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकEknath Shindeएकनाथ शिंदेDamधरण