शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

पत्रीपुलाचे काम लवकर मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:26 IST

एकनाथ शिंदे : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाचाही घेतला आढावा

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण तसेच कल्याणच्या पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी दिले.

भिवंडी-कल्याण-शीळ सहापदरीकरणाच्या कामासह पत्रीपुलाच्या कामाची पाहणी शिंदे यांनी सोमवारी केली. यावेळी त्यांच्यासोबत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.शीळ येथून सहापदरीकरणाच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी सुरू केली. भिवंडी-शीळ-कल्याण रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी हा रस्ता सहापदरी करण्याच्या कामाचा शुभारंभ ३० डिसेंबर २०१८ ला पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी पत्रीपुलाच्या नव्या उभारणीसाठीच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी ३९० कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी १५० कोटी सार्वजनिक बांधकाम विभाग व २४० कोटी रुपये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खर्च केले जाणार आहेत. सध्या हा रस्ता चारपदरी असून, त्याचे सहापदरीकरण करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी दुतर्फा गटारे तयार केलेली नाहीत. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ते तातडीने करावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५ मीटरचा रस्ता हवा. त्यानुसार, हा रस्ता सहापदरीकरणामुळे एकूण ३० मीटर रुंदीचा असावा. त्यासाठी आज काही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोजमाप करण्यात आले. रस्त्याच्या पाहणीनंतर शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेतला. पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पूल उभारण्यासाठी पुलाचे आधारखांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या वरचा भाग हैदराबाद येथे तयार करण्यात येत आहे. पत्रीपुलाचे काम मार्च २०२० अखेर पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले, तरी हे काम डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य अधिकारीवर्गाने डोळ्यांसमोर ठेवून हे काम गतीने मार्गी लावावे, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.बदलापूर जंक्शन येथे हवा उड्डाणपूलकल्याण-शीळ रस्त्यावर काटई गावानजीक असलेल्या बदलापूर जंक्शनकडून एक रस्ता अंबरनाथमार्गे बदलापूरला जातो. बदलापूर जंक्शन ते पलावा जंक्शन यादरम्यान वाहतूककोंडी होते. तेथे एक एलिव्हेटेड मार्गिका असावी. त्यामुळे या जंक्शनपासून पलावापर्यंत वाहतूककोंडी होणार नाही, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. त्यावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे