शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजना सुरु करा - वर्षा भानुशाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:08 IST

मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मीरारोड : मुंबई महापालिकेने शहरातील खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा योजना मोबाईल अ‍ॅपद्वारे सुरु केली असून तशीच योजना मीरा भाईंदरमध्ये सुरु करण्याची मागणी भाजपा नगरसेविका वर्षा भानुशाली यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खड्डे जाहीरपणे दिसत असताना देखील ते तातडीने भरण्याचे काम होत नाही. पाऊस जाऊन अनेक दिवस झाले तरी खड्डे मात्र कायम आहेत.

त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेप्रमाणेच मीरा भाईंदर महापालिकेने मोबाईल अ‍ॅप विकसित करुन बक्षीस योजना सुरु करावी. नागरिकांनी दाखवलेले खड्डे २४ तासात पालिकेने भरल्यास तक्रारदार नागरिकाला ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात यावे. यामुळे शहरातील खड्डे निदर्शनास येऊन ते भरण्याचे काम वेगाने होईल. जेणेकरुन शहर खड्डे मुक्त होईल असे वर्षा भानुशाली यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर