शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
2
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
3
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
4
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
5
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
6
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
7
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
8
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
9
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
10
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
11
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
12
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
13
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
14
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
15
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
16
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
17
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
18
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
19
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
20
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
Daily Top 2Weekly Top 5

जीवावर उदार होऊन वाचवले २५ प्राण्यांचे जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:01 IST

पुराचा अनाथाश्रमाला फटका : ४५ जणांवर सुरू होते उपचार, प्राणिमित्राच्या धैर्याचे होत आहे कौतुक

पंकज पाटील

बदलापूर : बदलापूरच्या चामटोली परिसरात महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकलेली असताना सर्व सरकारी यंत्रणा ही प्रवाशांचे जीव वाचवण्यात मग्न होती. अशा महापुरातही आपल्या जीवाची पर्वा न करता एका प्राणिमित्राने तब्बल २५ प्राण्यांचे जीव वाचवले. या प्राणिमित्राचा अपंग प्राण्यांसाठी अनाथाश्रम असून याच आश्रमात एकूण ४५ प्राणी उपचार घेत होते. त्यातील २५ जणांचे जीव वाचले असून उर्वरित प्राण्यांपैकी काही प्राणी स्वत: धडपड करून सुरक्षितस्थळी गेले. काही प्राणी या महापुरात वाहून गेले.

ज्या भागात महालक्ष्मी अडकली होती, त्याच परिसरात रेल्वेमार्गाला लागून पानवठा फाउंडेशनचे प्रमुख गणराज जैन अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम चालवतात. अपघातात जखमी झालेले आणि अपंगत्व आलेल्या प्राण्यांचा सांभाळ ते करतात. त्यांच्या या आश्रमात ४५ विविध प्राणी उपचार घेत होते. २६ जुलै रोजी रात्री पाण्याची पातळी वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या आश्रमातील प्राण्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू केले. रात्री ११ पासून त्यांचे हे काम सुरू होते. आश्रम हा रेल्वेमार्गाच्या पलीकडे असल्याने त्यांना प्राण्यांना हलवण्यात अडचणी येत होत्या.प्राण्यांचे स्थलांतर सुरू असतानाच पाण्याची पातळी अचानक वाढली. तोपर्यंत २५ प्राण्यांना हलवण्यात आले होते. मात्र, पाणी धोकादायक पातळीच्यावर गेल्यावर स्थानिक ग्रामस्थांनीच त्यांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. पाण्याची खोली आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना रोखले गेले, तरी त्यांनी आश्रमातील २० प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात उडी मारून पाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, त्या वेळेस सर्वच प्राण्यांना आणणे शक्य नसल्याने त्यांनी बांधलेल्या प्राण्यांची सुटका केली. तसेच लहान प्राण्यांना देवाच्या भरवशावर तेथेच सोडण्याची वेळ जैन यांच्यावर आली.काही प्राण्यांना त्यांनी उंच ठिकाणी ठेवले. तर, जखमी माकडालाही आश्रमाच्या पत्र्यावर ठेवत जैन हे पुन्हा सुरक्षितस्थळी आले. मात्र, येताना पुन्हा त्यांनी दोन जखमी श्वानांना आपल्या खांद्यावर आणले. जैन यांनी पहाटे ४ पर्यंत या प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने त्यांना पुढे काही करता आले नाही. मात्र, या पावसात वाहून गेलेल्या २० पैकी सात प्राणी हे पुन्हा आश्रमात आले आहेत. मात्र, या प्राण्यांची अवस्था बिकट आहे. अजूनही हे प्राणी भेदरलेल्या अवस्थेत आहे. या पुरात एक घोडी आणि तिचा बछडा वाहून गेला आहे. या घोडीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्या घोडीचे पिलू मात्र बचावले आहे. वाहून गेलेल्या इतर प्राण्यांचे मृतदेह सापडले असून अजूनही १० ते १२ प्राणी बेपत्ता असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.या पुरात आश्रमाचीही दुरवस्था झाली आहे. असे असले तरी पुन्हा नव्याने हा आश्रम उभारण्यात येईल. अनेक व्यक्ती या कामात हातभार लावतील. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेली साथ ही महत्त्वाची आहे. - गणराज जैन, प्राणिमित्र 

टॅग्स :thaneठाणे