शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कोरोनाच्या आपत्तीत 100 टक्के उपस्थितीच्या शासन आदेशाचा राजपत्रित अधिकार्‍यांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 17:19 IST

ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सोमवारी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीने दिले आहे.

ठाणे : सर्व राज्य शासकीय कार्यालयात गट अ आणि ब अधिकाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीचा राज्य शासनाने आदेश जारी केलेला आहे. मात्र कोरोनाच्या या आपत्तीच्या कालावधीत अधिकाऱ्यांच्या 100 टक्के उपस्थितीच्या या आदेशाचा निषेध व्यक्त करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सोमवारी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीने दिले आहे.

कार्यालयात 100 टक्के उपस्थितीच्या शासन आदेशामुळे गेल्या पंधरा दिवसांत उदभवलेल्या समस्यांची माहिती, अधिकारी महासंघाने निवेदनाद्वारे तसेच संबंधिताना प्रत्यक्ष भेटून शासनाच्या वारंवार निदर्शनास आणली आहे. परंतु राज्य शासनाने त्यावर अद्याप ठोस आणि निश्चित अशी उपाययोजना न करता अक्ष्यम्य असे दुर्लक्षच केलेले आहे, असा आरोपही अधिकार्‍यांनी केला. शासनाच्या या निष्क्रिय भूमिकेबाबत सर्व अधिकारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. आंदोलनात्मक भूमिका घेण्याकरिता महासंघावर दबाव वाढला आहे. एकतर्फी निर्णयातून उदभवलेल्या या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 21 सप्टेंबर हा राज्यातील सर्व राजपत्रित अधिकारी 'निषेध दिन' पाळत असल्याचेही या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत शासन आदेशाचा निषेध व्यक्त केला. 

यानंतरही शासनाने गांभीर्याने, अपेक्षित दखल न घेतल्यास 'कामबंद" सारखे प्रखर आंदोलन हाती घेण्याचा इशाराही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिला. राज्य शासनाच्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या उदात्त विचाराप्रमाणे अधिकारी महासंघ हे देखील आमचे कुटुंब असून, कुटुंबाच्या काळजीपोटी आम्हाला हा निर्णय नाइलाजास्तव घ्यावा लागत आहे. शासनाने हा विषय अधिक प्रतिष्ठेचा न करता व्यवहार्य मार्ग तत्परतेने काटावा अशी, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यां ना भेटलेल्या या शिष्टमंडळात या जिल्हा समन्वय समितीचे सचिव शेषराव बडे यांच्यासह बाळकृष्ण क्षीरसागर, डॉ. अविनाश भागवत, उपाध्यक्ष मोहन पवार आदी अधिकारी उपस्थित होते.