शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...अन् तळीरामांचा गटारीचा प्लान फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 17:23 IST

गटारी साजरी करण्याच्या योजनांवर पाणी

ठाणे: दारू पिण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वॉच ठेवला आहे. वनात जाणाऱ्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला असून वनात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येऊरमध्ये असलेल्या सर्व प्रवेशाच्या ठिकाणी सहा तुकड्यांमध्ये ४२ कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला होता.बुधवारी  गटारी (दर्श) अमावस्या असल्याने तळीराम आणि मांसाहार करणाऱ्यांची सर्वत्र पार्ट्या होत असताना येऊर (ठाणे) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मात्र असे दृश्य दिसून आले नाही. पावसाचा मोसम आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल असल्याने या ठिकाणी पार्ट्या करण्याची योजना अनेक तरुण आणि तळीरामांनी आखल्या होत्या. मात्र वन वन विभाग आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे त्यांना पार्ट्यांचा बेत पूर्ण करता आला नाही. ठाणे पोलिसांनी येऊरच्या मानवी वसाहतींमध्ये नाक्यांनाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. तर वन विभागात जाणाऱ्या पॉइंटवर वन विभागाने ६ तुकड्या बनवून ४२ कर्मचारी-अधिकाऱ्यांमार्फत बंदोबस्त ठेवला होता. एकालाही वनात जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान वनात जाण्यास मनाई असतानाही अनेक उत्साही तरुण-तरुणी आतमध्ये लांबवर जातात. आतमध्ये वन्य प्राणी असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून विशेष खबरदारी घेतल्याचे वन विभाग अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.