शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

...अन् तळीरामांचा गटारीचा प्लान फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 17:23 IST

गटारी साजरी करण्याच्या योजनांवर पाणी

ठाणे: दारू पिण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वॉच ठेवला आहे. वनात जाणाऱ्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला असून वनात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येऊरमध्ये असलेल्या सर्व प्रवेशाच्या ठिकाणी सहा तुकड्यांमध्ये ४२ कर्मचाऱ्यांचा पहारा ठेवण्यात आला होता.बुधवारी  गटारी (दर्श) अमावस्या असल्याने तळीराम आणि मांसाहार करणाऱ्यांची सर्वत्र पार्ट्या होत असताना येऊर (ठाणे) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मात्र असे दृश्य दिसून आले नाही. पावसाचा मोसम आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल असल्याने या ठिकाणी पार्ट्या करण्याची योजना अनेक तरुण आणि तळीरामांनी आखल्या होत्या. मात्र वन वन विभाग आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे त्यांना पार्ट्यांचा बेत पूर्ण करता आला नाही. ठाणे पोलिसांनी येऊरच्या मानवी वसाहतींमध्ये नाक्यांनाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. तर वन विभागात जाणाऱ्या पॉइंटवर वन विभागाने ६ तुकड्या बनवून ४२ कर्मचारी-अधिकाऱ्यांमार्फत बंदोबस्त ठेवला होता. एकालाही वनात जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान वनात जाण्यास मनाई असतानाही अनेक उत्साही तरुण-तरुणी आतमध्ये लांबवर जातात. आतमध्ये वन्य प्राणी असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून विशेष खबरदारी घेतल्याचे वन विभाग अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.