शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

‘नीरी’कडून वायूची तपासणी : विहिरीत आढळली मिथेनची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 04:27 IST

पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली होती. या विहिरीत रासायनिक अथवा विषारी वायू खोलवर असल्याचा संशय व्यक्त होत होता.

कल्याण - पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली होती. या विहिरीत रासायनिक अथवा विषारी वायू खोलवर असल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यानुसार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाने राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (नीरी) सोमवारी पाचारण केले होते. या संस्थेने दुपारी ३ वाजल्यापासून तेथे सयंत्राद्वारे विहिरीतील विषारी वायूची तपासणी सुरू केली. त्याचा अहवाल लवकरच मिळणार आहे. मात्र, विहिरीत मिथेन वायूची मात्रा आढळली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील व उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी विहिरीवर ‘नीरी’च्या अधिकाऱ्यांना सयंत्र लावण्यास सांगितले. सयंत्राद्वारे विहिरीतील प्राणवायू, गंधक आणि मिथेन वायूची मात्रा त्यातून स्पष्ट होणार आहे. यंत्र लावताच तेथे मिथेन वायूची मात्रा ८०० पार्ट्स पर मिलियन इतकी आढळून आली. जागतिक निकषांनुसार माणसाचा मृत्यू ५०० ते एक हजार पार्ट्स पर मिलियन इतक्या मिथेन वायूमुळेही होऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती आहे.विहीर स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात प्रथम जो एक जण उतरला, तो बाहेर न आल्याने अन्य दोन जण गेले. त्यानंतर, दोन फायरमन गेले. या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्याने विहिरीच्या तळाशी असलेला गाळ ढवळून निघाला. घटना घडली, त्यावेळी मिथेन वायूचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. घटनेच्या दुसºया दिवशी विहिरीतील गाळ उपसण्यात आला. त्यामुळे विहिरीच्या तळाशी गाळासह २० टक्के पाणी दिसत होते. तर, गाळ काढल्यावर विहीर दुसºया दिवशी ८० टक्के भरली. आज विहिरीतील पाणी कठड्यावरून बादलीने भरून घेता येईल, इतके वरती आले आहे.कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी व घरगुती सांडपाणी मिसळून विहीर प्रदूषित झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहिरीच्या परिसरातील कारखान्यातून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी सोडले जात नसल्याचा प्राथमिक पाहणी अहवाल दिला होता. तर, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारखाने बंद करण्याची नोटीस कारखान्यांना दिली.कायदेशीर बाबी तपासणारकेडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी दोन दिवसांपूर्वी विहिरीची पाहणी करून ती बुजवण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, विहीर खाजगी मालकीची आहे. त्यामुळे त्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून ती बुजवण्यात येईल, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी आज दिले.विहिरीचे मालक हे मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी गुजरातला गेल्याने ते परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करून व कायदेशीर बाबी तपासून विहीर बुजवली जाणार आहे.स्फोटक परिस्थितीची भीतीविहिरीच्या तळाशी विषारी वायू आहेत. ते काढले गेले पाहिजे. अन्यथा, ते विषारी वायू आसपासच्या सांडपाण्याच्या नलिकेतून अन्य ठिकाणी मार्गस्थ होऊन तेथे स्फोटक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याण