शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘नीरी’कडून वायूची तपासणी : विहिरीत आढळली मिथेनची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 04:27 IST

पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली होती. या विहिरीत रासायनिक अथवा विषारी वायू खोलवर असल्याचा संशय व्यक्त होत होता.

कल्याण - पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली होती. या विहिरीत रासायनिक अथवा विषारी वायू खोलवर असल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यानुसार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाने राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (नीरी) सोमवारी पाचारण केले होते. या संस्थेने दुपारी ३ वाजल्यापासून तेथे सयंत्राद्वारे विहिरीतील विषारी वायूची तपासणी सुरू केली. त्याचा अहवाल लवकरच मिळणार आहे. मात्र, विहिरीत मिथेन वायूची मात्रा आढळली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील व उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी विहिरीवर ‘नीरी’च्या अधिकाऱ्यांना सयंत्र लावण्यास सांगितले. सयंत्राद्वारे विहिरीतील प्राणवायू, गंधक आणि मिथेन वायूची मात्रा त्यातून स्पष्ट होणार आहे. यंत्र लावताच तेथे मिथेन वायूची मात्रा ८०० पार्ट्स पर मिलियन इतकी आढळून आली. जागतिक निकषांनुसार माणसाचा मृत्यू ५०० ते एक हजार पार्ट्स पर मिलियन इतक्या मिथेन वायूमुळेही होऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती आहे.विहीर स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात प्रथम जो एक जण उतरला, तो बाहेर न आल्याने अन्य दोन जण गेले. त्यानंतर, दोन फायरमन गेले. या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्याने विहिरीच्या तळाशी असलेला गाळ ढवळून निघाला. घटना घडली, त्यावेळी मिथेन वायूचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. घटनेच्या दुसºया दिवशी विहिरीतील गाळ उपसण्यात आला. त्यामुळे विहिरीच्या तळाशी गाळासह २० टक्के पाणी दिसत होते. तर, गाळ काढल्यावर विहीर दुसºया दिवशी ८० टक्के भरली. आज विहिरीतील पाणी कठड्यावरून बादलीने भरून घेता येईल, इतके वरती आले आहे.कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी व घरगुती सांडपाणी मिसळून विहीर प्रदूषित झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहिरीच्या परिसरातील कारखान्यातून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी सोडले जात नसल्याचा प्राथमिक पाहणी अहवाल दिला होता. तर, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारखाने बंद करण्याची नोटीस कारखान्यांना दिली.कायदेशीर बाबी तपासणारकेडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी दोन दिवसांपूर्वी विहिरीची पाहणी करून ती बुजवण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, विहीर खाजगी मालकीची आहे. त्यामुळे त्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून ती बुजवण्यात येईल, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी आज दिले.विहिरीचे मालक हे मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी गुजरातला गेल्याने ते परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करून व कायदेशीर बाबी तपासून विहीर बुजवली जाणार आहे.स्फोटक परिस्थितीची भीतीविहिरीच्या तळाशी विषारी वायू आहेत. ते काढले गेले पाहिजे. अन्यथा, ते विषारी वायू आसपासच्या सांडपाण्याच्या नलिकेतून अन्य ठिकाणी मार्गस्थ होऊन तेथे स्फोटक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याण