शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उल्हासनगरमधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गॅस गळती, एकाचा मृत्यू तर अकरा जण गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 07:14 IST

शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गॅस गळती होऊन, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर अकरा कामगार गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

उल्हासनगर : शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री साडेबारा वाजता गॅस गळती होऊन, एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर अकरा कामगार गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-1 शहाड गावठाण परिसरात सेंच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीत हजारो कामगार काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील काम ठेकेदाराला दिले होते. ठेकेदाराने खाजगी कामगारांमार्फत काम करणे सुरू केले असता काम लवकर करण्याचा तगादा कंपनी व्यवस्थापनाने ठेकेदाराच्या मागे लावल्याचे समजते. दरम्यान, ठेकेदाराने रात्री सव्वा - साडे बारा वाजता कामाला सुरुवात केली असता कंपनीतील पत्रा तुटून विषारी गॅसची गळती सुरू झाली. त्यावेळी  कंपनीत एकच धावपळ उडाली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने गॅस गळतीवर नियंत्रण मिळविले आहे. मात्र, या गॅस गळतीच्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर अकरा जण गंभीर असून त्यांना कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.  दरम्यान, सेंच्युरी रेयॉन कंपनीतील गॅस गळतीच्या घटनेमुळे शहाड गावठाण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर