शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन, किमान वेतनाची मागणी

By सदानंद नाईक | Updated: June 27, 2023 19:22 IST

महापालिका प्रशासनाने आंदोलनाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतल्याची माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली आहे.

 उल्हासनगर : शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला, मग कामगारांना किमान वेतन का नाही?. असा प्रश्न करीत करीत कंत्राटी कामगारांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. महापालिका प्रशासनाने आंदोलनाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतल्याची माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली आहे.

 उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेने कोणार्क कंपनीला दिला. दरदिवशी ४ लाख ४३ हजाराचा ठेका दुप्पट ८ लाखा पेक्षा जास्त किंमतीला गेल्या वर्षी देण्याला महासभेने मंजुरी दिली. तसेच महापालिकेने भारत स्वछता अभियाना खाली नवीन वाहने देण्यात आली आहे. असे असतांना कंत्राटी कामगारांना कोणतीही सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली नाही. तसेच शासन नियमानुसार किमान वेतन देण्याची मागणी।करीत कामगारांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. कामगारांच्या विविध मागणीसाठी कामगार आयुक्त कार्यालयासह संबंधितांना निवेदन दिले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी याबाबत दखल घेत असल्याचे सांगितल्याने, कामगारांचे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे कामगार नेते संदीप गायकवाड यांनी सांगितले.

 महापालिकेतील कचरा उचलण्याचा ठेका दुपट्ट किंमतीला देऊनही शहरात कचऱ्याचे ढीग जैसे थे आहे. तसेच कचरा उचळणार्या कंत्राटी कामगारात असंतोष निर्माण झाला असून महापालिका आयुक्तांनी अश्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वेळेत वेतन न देणे, कमी वेतन देणे, अटी व शर्तीनुसार सुविधा न पुरविणे आदी आरोप कामगारांनी आंदोलन दरम्यान केले आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरagitationआंदोलन