शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आंदोलनासाठी हवा काढलेल्या वाहनांमुळे कचरा उचलण्यास विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 11:43 IST

ठेकेदाराने कंत्राटी कामगारांचे वेतन थकवल्यामुळे डोंबिवलीत खंबाळपाडा डेपोमध्ये कचरा वाहक घंटागाडी आणि सफाई कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले होते.

डोंबिवली - ठेकेदाराने कंत्राटी कामगारांचे वेतन थकवल्यामुळे डोंबिवलीत खंबाळपाडा डेपोमध्ये कचरा वाहक घंटागाडी आणि सफाई कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान अज्ञातांनी वाहनांची हवा काढली होती, त्यामुळे आयुक्तांच्या आश्वासनानंतर तीन तासात आंदोलन मागे घेण्यात आले, परंतू हवा काढलेली 40हून अधिक वाहने त्या दिवशी रस्त्यावर न धावल्याने दसऱ्यालाही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून आले.

पण यासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही वाहनांची हवा काढलेली नाही, कोणी काढली ते आम्हाला माहिती नाही. महापालिका प्रशासनाने त्याचा शोध घ्यावा. त्यामुळे हवा कोणी काढली हे मात्र स्पष्ट झाले नसले तरी घनकचरा विभागाला या सगळयाचा मनस्ताप मात्र झाला होता. वाहनांची हवा काढण्याला नेमके जबाबदार कोण? हे कृत्य करत असताना खंबाळपाडा आगारातील सुरक्षा रक्षकांचे लक्ष नव्हते का? असा सवाल महापालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी विलास जोशी यांना केला असता ते म्हणाले की, आमच्या सुरक्षा रक्षकांनी भिंतीवरून येत कोणी हवा काढली हे पाहिले आहे, पण आता समस्या सुटली असल्याने त्या विषयाच्या खोलात न जाता आता यापुढे कोणी आंदोलन करणार असेल तर मात्र पोलिस व्हॅन बोलावून असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा मानस असेल.

जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेतन संदर्भात ठिय्या आंदोलन केले, तो त्या कामगारांचा प्रश्न होता, पण त्यासाठी वाहनांचे नुकसान करणे योग्य नव्हते. 15 आरसी गाड्या, आणि सुमारे 25 घंटागाड्यांची हवा काढल्याने ठिकठिकाणच्या जागेवर कॉम्प्रेसर लावणे, वाहन सुस्थितीत आणणे यामध्ये वेळ गेला. परिणामी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत गाड्या रस्त्यावर धावल्या नाहीत. त्याचा परिणाम गुरूवारी दसऱ्याला झाला आणि कचरा विल्हेवाटीच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरले. यापुढे अशी समस्या उद्भवू नये यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात येणार असून जे कोणी असे कृत्य करेल त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे नेमकी हवा कोणी काढली हे मात्र अनुत्तरीतच असून ज्यांनी काढली हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा संबंधितांवर काय कारवाई करायची याबाबतचे प्रशासनाचे कोणतेही धोरण नाही हे देखिल स्पष्ट झाले. दरम्यान, त्या कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन शुक्रवारी सकाळी पहिल्या सत्रात आरटीजीएस पद्धतीने केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली