शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

भंडार्ली प्रकल्पासाठी आता एक आठवड्याचा अल्टिमेटम, अन्यथा...

By अजित मांडके | Updated: July 15, 2023 15:16 IST

जोपर्यंत मुख्यमंत्री आश्वासन देत नाहीत तोपर्यंत भंडार्ली प्रकल्पाच्या ठिकाणी एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा स्थानिकानी दिला. 

ठाणे : एक वर्षात भंडार्ली कचरा प्रकल्प बंद केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु वर्षभरानंतरही हा प्रकल्प सुरु असल्याने येथील शेतकºयांचे नुकसान झाले असून, घाणीने आणि दुर्गंधीने येथील नागरीक त्रस्त झाल्याने अखेर शुक्रवारी हा प्रकल्प बंद पाडल्यानंतर शनिवारी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवासी महापालिकेत धडकले. यावेळी एका आठवड्यात मुख्यमंत्रीची भेट झाली नाही तर शनिवार पासून भंडार्ली प्रकल्प बंद केला जाईल असे अल्टिमेटम रहिवाशांनी पालिकेला दिले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

दिवा येथील डम्पिंग बंद करुन ठाणे महापालिकेने भंडार्ली येथे तात्पुरता स्वरुपात कचरा प्रकल्प उभारला आहे. परंतु शुक्रवारी मनसेचे आमदार प्रमोद पाटील आणि स्थानिकांनी हा प्रकल्पच बंद पाडला. त्यानंतर शनिवारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार असल्यामुळे या प्रकल्पाचा नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि दुगंर्धी येणार नाही, असा दावा पालिकेने केला होता. परंतु स्थानिकांनी केलेल्या आरोपामुळे हा दावा फोल कसा ठरला याचे पुरावेच यावेळी सादर केले. कचऱ्यामुळे शेतीचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचबरोबर नागरिक दुगंर्धीने हैराण झाले आहेत. 

विहीरीतील पाणी खराब झाले आहे, अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत आदी समस्या यावेळी रहिवाशांनी मांडल्या. या प्रकल्पांच्या बदल्यात १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचीही सरकारने अद्याप पूर्तता केली नसल्याचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी सांगितले. या शिवाय हा प्रकल्प करीत असतांना येथील रहिवाशांना रस्ता दिला जाईल, इतर सोई सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्याची देखील अद्याप पुर्तता झाली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट होताना दिसत नाही, अशी टीका आमदार पाटील यांनी केली आहे.

दरम्यान महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी भंडार्ली प्रकल्प बंद करण्यासाठी पुढील दोन महिन्यांची मुदत द्यावी अशी विनंती केली. १५ सप्टेंबरच्या आत येथील कचरा प्रकल्प बंद केला जाईल आणि डायघर प्रकल्प सुरु केला जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले. परंतु रहिवासी त्यांचे म्हणने ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. आधी मुख्यमंत्र्याची भेट घडवून आणा अन्यथा कचरा टाकू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यावर आयुक्तांनी येत्या शुक्रवारच्या आत मुख्यमंत्र्यासमेवत भेट घालून दिली जाईल आणि तुमचे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले. 

तसेच येथील रस्त्याची, दुर्गंधीची समस्या तत्काळ सोडविली जाईल. रहिवाशांना या प्रकल्पाचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय १४ गावांचा समावेश करण्याबाबत संबधींताशी चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. अखेर शुक्रवार पर्यंत मुख्यमंत्र्यासोबत मिटींग लागली नाही तर शनिवार पासून भंडार्लीचा प्रकल्प बंद केला जाईल असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याबरोबर, फवारणी, दुर्गंधी दुर व्हावी आणि रस्त्याचे कामही केले जावे असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे