शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दळखणमध्ये इ-रिक्षाद्वारे गोळा होणार कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:45 IST

ग्रामपंचायतीचा उपक्रम : पर्यावरणाला दिले महत्त्व, चार तास चार्ज केल्यावर १०० किलोमीटर धावणार

आसनगाव : शहापूर तालुक्यातील दळखण ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच भगवान मोकाशी यांनी लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती असल्यास गावाचा कायापालट कसा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. सोमवारी गावात इ-रिक्षाद्वारे कचरा गोळा करणाऱ्या सुविधेचे उद्घाटन करून दळखण ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यात पहिली ठरली आहे. या अनोख्या उपक्र माबद्दल मोकाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ठाणे जिल्ह्यात पहिली इ-रिक्षा म्हणजेच इंधन विरहीत इलेक्ट्रिकवर चालणारी व पर्यावरणमुक्त अशा इ-रिक्षाद्वारे कचरा गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ४ तास चार्ज केल्यावर १०० किलोमीटर चालते. ओला व सुका कचरा गोळा करणारी ही इ-रिक्षा वापरणारी दळखण ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली ठरली आहे.

ग्रूप ग्रामपंचायत दळखणतर्फे इ-रिक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रभारी सरपंच मोकाशी, मंगला डोके, माजी उपसरपंच दिगंबर म्हसकर, भाई देहेरकर, विनायक आपटे, रफिक सय्यद, तुकाराम सरखोत, मधुकर मोकाशी, तुकाराम सरखोत, शरद सरखोत, चंद्रकांत म्हसकर, भाऊसाहेब भेरे, पांडुरंग मोकाशी, प्रवीण सरखोत, मारु ती मोकाशी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

या आहेत अन्य सुविधादळखण गावामध्ये करण्यात आलेल्या सोयीसुविधा व विकासकामामध्ये विविध योजनेअंतर्गत गरीब व गरजूंना त्यांचे हक्काचे घरे, स्वच्छतागृह, रस्त्यांची कामे, पेव्हर ब्लॉक बसवणे, तरूणांना खेळाचे साहित्य देणे, आरोग्य शिबिर, व्यायामशाळा, प्रत्येक कुटुंबास कचºयाचे डबे देणे, वृक्षारोपण करणे आदी उपक्रम राबवले आहेत. ग्रामपंचायत तसेच कोणत्याही सुविधेबाबत तक्र ार असेल तर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण गावात सीसीटीव्ही लावले असून प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे ८ हायमास्ट बसवण्यात आले आहेत.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा