शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

गणपती गेले गावाला...चैन पडेना आम्हाला...कल्याण-डोंबिवलीत भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:21 IST

आपल्या लाडक्या बाप्पाचा १२ दिवस पाहुणचार केल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला कल्याण-डोंबिवलीतील भाविकांनी जड अंत:करणाने बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

कल्याण : आपल्या लाडक्या बाप्पाचा १२ दिवस पाहुणचार केल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला कल्याण-डोंबिवलीतील भाविकांनी जड अंत:करणाने बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जनासाठी बहुतांश भाविकांनी केडीएमसीने उभारलेल्या पर्यावरणाभिमुख कृत्रिम तलावाला पसंती दिली. महापालिका हद्दीत १६९ सार्वजनिक गणेश मंडळांचे, तर १० हजार १५० घरगुती गणपतींचे विविध ठिकाणचे गणेशघाट, तलाव, विहिरी आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झाले. दरम्यान, दुसºया दिवशी बुधवारी दुर्गाडी येथील गणेशघाटाची बदलापूरच्या प्रकाश ज्ञानशक्ती चॅरिटेबल ट्रस्टने स्वच्छता केली.कल्याण-डोंबिवली शहरांत ४४ हजार १०० घरगुती गणपती व २८८ सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विसर्जनस्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच पर्यावरण संतुलनासाठी केडीएमसीने १६ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. यातील चार कृत्रिम तलाव कल्याणमध्ये, तर उर्वरित डोंबिवलीत तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे दीड, पाच, सात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशभक्तांनी या कृत्रिम तलावांना विशेष पसंती दिली. या विसर्जनाच्या दिवशी १५ हजार ६०३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.गणेशभक्तांनी निर्माल्य तलावात न टाकता विसर्जनस्थळी नेमलेल्या स्वयंसेवकांकडे द्यावे, असे आवाहनही करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. निर्माल्याचे संकलन शहरातील विविध सामाजिक संस्था, नानासाहेब धर्माधिकारी संस्था, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यामार्फत करण्यात आले. त्यामुळे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यास मोठा हातभार लागला. १३ गणेश विसर्जनस्थळांवर सीसीटीव्ही, अग्निशमन जवान, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही तैनात होते. विद्युत विभागाने ५० जनरेटरची व्यवस्था केली होती.अनंत चतुर्दशीला महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी प्रत्येक विसर्जनस्थळावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. विसर्जनाच्या दिवशी पर्यावरणरक्षण व संवर्धनास हातभार लावल्याने देवळेकर व आयुक्त पी. वेलरासू यांनी भक्तांचे आभार मानले आहेत.कल्याण-डोंबिवलीतील मानाच्या गणपतींवर विसर्जन मार्गांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात आली. विशेष म्हणजे, उल्हासनगरचे गणपतीही अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवसापर्यंत दुर्गाडी गणेशघाटांवर विसर्जनासाठी येतात. परंतु, यंदा उल्हासनगरला विसर्जनाची व्यवस्था झाल्याने त्यांचे गणपती कमी संख्येने कल्याणला आले. त्यामुळे मंगळवारी रात्रीच या गणेशघाटावरील विसर्जन सोहळा संपला.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन