शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मोबाईलची जबरीने चोरी करणारे टोळके जेरबंद, राबोडी पोलिसांची कामगिरी

By जितेंद्र कालेकर | Updated: January 24, 2023 21:05 IST

आरोपींकडून २ लाख ३२ हजारांचे २० मोबाईल हस्तगत

ठाणे: मोटारसायकलवरुन येत रिक्षातील प्रवासी किंवा पादचाºयांच्या हातातील मोबाईल जबरीने चोरुन पळणाºया पवन गौंड याच्यासह चौघांना राबोडी पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून २० मोबाईल आणि तीन मोटारसायकली असा तीन लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती मार्गावरील हरिदास नगर येथील सेवा रस्त्यावरील रिक्षा स्टॅन्ड येथे १५ जानेवारी २०२३ रोजी सुनिलकुमार गौंड (३५, रा. माजीवडा, ठाणे) हे त्यांच्या घरी पायी जात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांपैेकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने खेचून मुंबईच्या दिशेने पलायन केले. काही अंतरावर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला पवन गौंड (२२, रा. भिवंडी ) हा खाली पडला. तर त्याच्या सोबत असलेले इतर दोघे मात्र मोटारसायकलवरुन पसार झाले. पवनला नागरीकांच्या मदतीने राबोडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याचवेळी त्याच्यासह तिघांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्हयाच्या तपासाच्या दरम्यान विकास राजभर (२२, रा. साठेनगर,भिवंडी, ठाणे ) ,संजय राजभर (२०, रा. कारवली, भिवंडी) आणि किशमोहन गौड (२२, गणेशनगर, कामतघर, भिवंडी) या तिघांनाही अटक केली.

या चौघांनी अशाच प्रकारे ठाणे शहरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलची जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन लाख ३२ हजार १३९ रुपयांचे २० मोबाईल तसेच जबरी चोरीसाठी वापरलेल्या एक लाख ३५ हजारांच्या तीन मोटारसायकली असा तीन लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याकडून नागरीकांच्या हातातून मोबाईल फोन जबरीने खेचून नेल्याचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. उपायुक्त गणेश गावडे, सहायक आयुक्त सोनाली ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र गुजर, उपनिरीक्षक दीपक पाटील, सोनाली अहिरे, हवालदार दयानंद नाईक, राजाराम पाटील आणि गिरीष पाटील आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :thaneठाणे