शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पालकमंत्र्यांमुळे दापुऱ्यात अवतरली गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:58 IST

गावकऱ्यांची गर्दी : स्वातंत्र्यकाळापासून प्रथमच मंत्र्यांची भेट, टंचाईग्रस्त भागांचा घेतला आढावा, योजना राबविण्याचे आदेश

कसारा : पाणी टंचाईग्रस्त शहापूर तालुक्यातील गावांना भेट देण्यासाठी मंगळवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या गावांचा दौरा केला. यात शिंदे यांनी वैयक्तिक खर्चातून पाण्याच्या टाक्या देत ग्रामस्थांची तहान भागवली. तालुक्यातील पेंढरघोळ, कानविंदे, डोंगरपाडा, अजनुप, दापूर माळ, यासह चिंतामण वाडी, ओहळाचीवाडी, गांगडवाडी परिसराला त्यांनी भेट दिली.

दौºयादरम्यान अतिदुर्गम दापूर माळ या गावातही दौरा केला. स्वातंत्र्य काळापासून या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद सदस्य देखील कधी फिरकला नव्हता. त्या दापूर गावात तब्बल तासाभराचा प्रवास करत शिंदे पोहोचले आणि दापुºयातील परिस्थिती जाणून घेतली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तेथेच तात्काळ जलपरी तसेच पाइपलाइन टाकून घेतली. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंद आहे. ही योजना सौरऊर्जेवर आधारित केल्याने पाणी तसेच वीज बिलाचा प्रश्नच नाही.

दापूरपासून तीन किमी. अंतरावरील सावरखेड गावात शासनाच्या कोणत्याही योजना पोहोचल्याच नसल्याचे ग्रामस्थांनी मंत्र्यांना सांगितल्यावर शिंदे यांनी महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे अभियंता तसेच वनविभाग, महसूल यंत्रणा यांना आदेश देत वीजेचा आणि पाण्याचा विषय निकाली काढला. पालकमंत्र्यांच्या या कार्यतत्परतेमुळे दापूर ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. पालकमंत्री धावून आल्याने आमचा प्रश्न निकाली निघाल्याचे विजय शिंगवा यांनी सांगितले. या दौºयात जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जि.प.अध्यक्षा मंजुषा जाधव तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.

गायधराचे थकीत बिल भरलेदरम्यान, अजनुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वरचा गायधरा या गावात पाणी योजना आहे. मात्र, वीज कट केल्याने योजना बंद होती. याची गंभीर दखल घेत तत्काळ शिंदे यांनी ४० हजार रुपये देण्याचे कबूल करत सहा दिवसांत गायधरा पाणी योजना सुरू करण्याचे आदेश दिले. या निर्णयाने तेथील ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.

दोन लाखांची मदतशिरोळ फाटा येथे दोन दिवसांपूर्वी जयराम धापटे आणि पप्पू धापटे या तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. त्या धापटे कुटुंबाची पालकमंत्री शिंदे यांनी भेट घेतली. तसेच मृत तरुणांच्या कुटुंबाला शिवसेनेच्या वतीने दोन लाख रुपयांची मदत केली.