शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ठाणे, भिवंडी परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: June 6, 2024 17:47 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या डायघर आणि भिवंडी परिसरातील घरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा (२५, रा. रांजनोली, भिवंडी) याच्यासह पाच जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. या टोळीकडून ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने असा आठ लाख ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपासाची सूत्रे हलविण्यात आली होती. डायघर भागात चोरी करणारा राजदूत उर्फ इम्रान शेख उर्फ सागर (२६, रा. भिवंडी) याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ३ मे २०२४ रोजी ताब्यात घेतले होते. डायघर भागात नोव्हेंबर २०२३ मध्ये एका घरातून चोरलेल्या चार मोबाईलची त्याने कबूली दिली. हे ४० हजारांचे मोबाईलही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. याच गुन्हयाच्या समांतर तपासामध्ये आरोपी सागर याच्याकडील चौकशीमध्ये अन्य ठिकाणी चोरी करणारे अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ वारा , मोहमद शमशुद्दीन (१९) मोहमद अन्सारी (२६) आणि मोहमंद खान (२८) या चौघांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी आणि उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ यांच्या पथकाने २ जून २०२४ रोजी अटक केली.

त्यांच्याविरुद्ध डायघर पोलिस ठाण्यात चोरीसह हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी मोहमद खान याच्याकडून एक लाख पाच हजारांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सहा लाख ९४ हजारांचे ४३ मोबाईल आणि तीन हजार सहाशेची रोकड असा ऐवज हस्तगत केला. तपासात डायघरमधील तीन गुन्हे आणि मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्याचा एक असे चार गुन्हे उघडडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, ४३ मोबाईल, स्कूटर आणि ष्घरफोडीसाठी वापरलेली सामुग्री असा आठ लाख ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आराेपींपैकी अख्तर खान याच्याविरुद्ध डायघरमध्ये दाेन तर िभवंडीत सहा असे आठ चाेरीचे गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी