शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गांधी पुलाच्या स्लॅबला तडे; भिवंडी पालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:30 IST

पावसामुळे शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले असतानाच महापालिकेचा बांधकाम विभाग व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्डे झाले आहेत.

भिवंडी : पावसामुळे शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले असतानाच महापालिकेचा बांधकाम विभाग व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्डे झाले आहेत. पुलावरील सिमेंटच्या स्लॅबला तडे गेले असून खड्ड्यांमुळे उड्डाणपूल धोकादायक होत चालला आहे.महापालिकेने रामेश्वर मंदिरापासून ते बागे फिरदोस मशिदीपर्यंत राजीव गांधी उड्डाणपुलाचे काम २००३ पासून सुरू होते. हे काम २००६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद््घाटन करण्यात आले. पुलासाठी पालिकेने १४ कोटी ९४ लाख ५५ हजार १२६ रुपये खर्चाची निविदा बनविली होती. मात्र, नंतर या निविदेची रक्कम सात कोटी रुपयांनी वाढवून २१ कोटी ९७ लाख ६२ हजार ६८ रुपयांचे काम जे. कुमार अ‍ॅण्ड कंपनीस देण्यात आले. तसेच या उड्डाणपुलाचा बांधकाम करार १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करण्यात आला होता.पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेले पाइप स्वच्छ न केल्याने मागील काही वर्षांपासून पुलावर पावसाचे पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यातून वेगाने वाहने गेल्यावर ते घाण पाणी पुलाखालून जाणाºया पादचारी किंवा दुचाकी चालकाच्या अंगावर पडते. दरवर्षी पुलावरील खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेकडून खर्च केला जातो. मात्र, खड्डे दुरुस्तीमुळे आता पुलावरील स्लॅबलाच तडे गेले असून, या बाबत पालिकेकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, ही दुरुस्ती करण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.अवजड वाहनांना ये-जा करण्यासाठी महामार्ग व राज्यमार्ग असतानाही वाहतूक पोलीस पालिका क्षेत्रात जड व अवजड वाहनांना प्रवेश देतात. मागील आठवड्यात काँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या धामणकरनाका ते नारपोली दरम्यान जाणारे जड वाहन खड्ड्यात कोसळल्याची घटना घडली आहे. पालिका प्रशासन व कंत्राटदाराकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रंदिवस शहरात अवजड वाहने या पुलावरून जाण्यासाठी सोडत आहेत. त्यामुळे अंजूरफाटा ते नदीनाका दरम्यान असलेल्या तीन उड्डाणपुलांना धोका निर्माण झाला आहे.वाहतूक थांबवाशहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पोलिसांनी ताबडतोब बंद करावी. तशा प्रकारच्या सूचना पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांना द्याव्यात, अशी मागणी परिवर्तन मंचचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली आहे. भविष्यात उड्डाणपुलावर अपघात झाल्यास त्याची पूर्णपणे जबाबदारी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांची राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूक